विरोधी पक्षनेतेपदाला नियम का लावता? उद्धव ठाकरेंचा सवालठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट दोघांमध्ये सुमारे २५ मिनिटे चर्चा झाल्याची माहितीदोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेता नाहीभास्कर जाधव यांचे नाव दिल्यानंतर निर्णय झाला नाहीठाकरेंची पत्रकार परिषदेत माहिती.Maharashtra Politics: संख्याबळाचा नियम लावत असाल तर उपमुख्यमंत्रीपदालाही कशाचाही आधार नाही. पण विरोधी पक्षनेतेपदाला नियम का लावता? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी यावर निर्णय व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. .राज्यातील महायुतीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असले तरी अद्याप विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि.१२ डिसेंबर) विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सुमारे २५ मिनिटे चर्चा झाल्याचे समजते..Soybean Purchase Fraud: सोयाबीन खरेदी केंद्रांसाठी पैसे, शेतकऱ्यांचा नऊ टक्के ओलाव्याचा सोयाबीन नाकारला; वडेट्टीवारांचा विधानसभेत गंभीर आरोप.या भेटीनंतर ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेता नाही. विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचे नाव दिले होते. पण भास्कर जाधव यांचे नाव दिल्यानंतर काहीच निर्णय झाला नाही, असे ठाकरे म्हणाले. .Maharashtra Assembly Session: विरोधी पक्षनेता पदाच्या निवडीवरून अध्यक्षांची कोंडी.अधिवेशन संपण्यापूर्वी विरोधी पक्षनेता नेमावा, असा आमचा आग्रह आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठीही विरोधी पक्षांकडून पत्र गेलेले आहे. यासाठी सभापतींकडे विनंती केली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेता निवडीचा अधिकार अध्यक्षांचा आहे. दोन्ही पदे रिकामी आहेत. अधिवेशन संपण्यापूर्वी याबाबतचा निर्णय जाहीर करावा, अशी आमची विनंती, आग्रह आहे. यावर अध्यक्षांनी विचार सुरु असून निर्णय घेऊ, असे सांगितल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. .पदे आहेत, पण त्या पदावर माणसे नाहीत. दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता मिळावा. नको ते लोक उपमुख्यमंत्रीपद घेऊन मिरवतात. ही पदे रद्द झाली पाहिजेत. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा. जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी हे सभागृह आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. .'शेतकऱ्याला तत्काळ मदतीची गरज'शेतकरी संकटात आहे. त्याच्या डोक्यावर टांगती तलावर आहे. त्याला तत्काळ मदत दिली पाहिजे. आपल्या कार्यकाळात ई-केवायसी नसताना २ लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले होते, असे ठाकरे यांनी नमूद केले..'वेगळ्या विदर्भाची मागणी होऊ शकत नाही'वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरही त्यांनी भाष्य केले. वेगळ्या विदर्भाची मागणी होऊ शकत नाही. विदर्भ हा महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्राच्या मुळावर हा आघात घालण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.