Jalgaon News: खानदेशात तुरीची मळणी सुरूच आहे. मळणीसाठी काहीशी मजूरटंचाई जाणवत असून, शेतकरी कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने मळणी, झोडणीचे काम करून घेत आहेत. या आठवड्यात अनेक भागांत मळणी पूर्ण होईल, अशी स्थिती आहे. .खानदेशात सुमारे १३००० हेक्टरवर तुरीची लागवड झाली होती. कमाल शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन पिकात आंतरपीक म्हणून तुरीची लागवड केली होती. तर जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर भागात अनेकांनी मुख्य पीक म्हणून जून, जुलैच्या सुरुवातीलाच ठिबकवर तुरीची लागवड केली होती. पूर्वहंगामी व कोरडवाहू तूर पिकातही मळणी सुरू झाली आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसाने कोरडवाहू क्षेत्रातील तूर पिकाला अनेक भागांत आधार मिळाला होता. .Farm Labour Shortage: सुगी आली तोंडावर, मजूर मिळेनात बांधावर .खानदेशात जूनमध्ये पाऊस कमी होता. यामुळे अनेकांनी जुलैत उशिराचे खरीप पीक म्हणून तुरीची लागवड केली होती. तुरीचे पीक सप्टेंबरपर्यंत बऱ्यापैकी होते. परंतु परतीचा पाऊस न आल्याने मुरमाड, हलक्या जमिनीत पिकाची स्थिती बिकट बनली होती. काळ्या कसदार क्षेत्रात पीक तग धरून होते. परतीचा पाऊस आला असता तर कोरडवाहू क्षेत्रातील तूर पिकही जोमात राहिले असते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..मागील आठवड्यातच तूर पिकाची कापणी करण्यात आली. अनेक शेतकरी खानदेशात तुरीची पारंपरिक पद्धतीने मळणी करतात. त्यात तूर कापणी करून ती दोन ते तीन दिवस वाळविण्यासाठी ठेवली जाते. यानंतर झोपणी करून शेंगांतील दाणे काढले जातात. हे दाणे गोळा करून त्यांची शेतात उफणणी करून स्वच्छता केली जाते..Labour Shortage : मजुरांच्या तुटवड्यामुळे इर्जिक पद्धतीने कोळपणी.तर मुख्य पीकधारक शेतकरी तुरीची कापणी करून मोठ्या मळणी यंत्राच्या मदतीने मळणी करून घेत आहेत. यात तुरीची कापणी करण्यासंबंधी मजुरी व इतर मेहनत घ्यावी लागत आहे. मळणीचे काम याच आठवड्यात सुरू झाले आहे.परंतु सध्या गावोगावी यात्रा-जत्रा व इतर शुभ कार्यक्रम आहेत. यामुळे मजूरटंचाई तूर मळणीसंबंधी जाणवत आहे. तूर मळणीसाठी कापणी व इतर बाबींवर एकरी तीन हजार रुपये खर्च येत आहे. तुरीची मळणी पुढे १५ ते २० दिवस सुरूच राहणार आहे..तुरीची मळणी करून शेतकरी ती लागलीच वाळवून घेत आहेत. अनेक शेतकरी आपल्या गावातच नजीकच्या मंडळीला तुरीची विक्री करीत आहेत. तर काही शेतकरी सध्या दर हवे तसे नसल्याने साठा करून घेत आहेत..उत्पादकता वेगवेगळीतुरीवर रोगराईदेखील होती. ऑक्टोबरमध्ये अळ्या व किडींची समस्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी घ्यावी लागली. परंतु पावसाचा ताण पडल्याने फुलोरा गळून पडला. तूर पिकाची मळणी अलीकडेच सुरू झाली आहे.यामुळे सरासरी उत्पादकता किती आहे, हे ठोसपणे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु पूर्वहंगामी तूर पिकात एकरी सहा ते सात क्विंटल उत्पादन येत आहे. कोरडवाहू पिकात एकरी दीड क्विंटलपर्यंत उत्पादन येत असल्याची माहिती मिळाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.