Sangli News: देशभरात सुरू असलेल्या पावसामुळे हळद पिकाला मोठा फटका बसला आहे. विशेषतः तेलंगणा, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये हळदीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. देशभरात २५ टक्क्यांपर्यंत पिकाचे नुकसान होण्याचा प्राथमिक अंदाज हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे..हळदीची लागवड गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २५ टक्क्यांनी वाढून ३ लाख ३२ हजार ७६७ हेक्टरवर होईल, असा अंदाज हळद संशोधन केंद्राने व्यक्त केला आहे. सद्यःस्थितीला हळद लागवड होऊन तीन महिन्यांचा काळ पूर्ण झाला आहे. पीक वाढीच्या आणि कंद फुटण्याच्या अवस्थेत आहे..Turmeric Farming: हळदीमध्ये संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर.मात्र, देशातील हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यात सतत पाऊस सुरू आहे. या पावसामुळे हळदीची अपेक्षित वाढ होण्यास अडचणी येत असल्याचे चित्र आहे. कंद फुटीचा काळ आहे. त्यातच शेतात पाणी साचून राहिले असल्याने त्याचा परिणाम कंदावर होण्याची भीतीही निर्माण झाली आहे. पाणी साचल्याने कंद कूज होण्याचीही शक्यता आहे. सततच्या पावसामुळे सध्याच्या परिस्थितीनुसार हळदीचे नुकसान वाढण्याचीही शक्यता आहे..उत्पादनाला फटका बसण्याची शक्यताकंद फुटण्याचा काळ सुरू आहे. अशा स्थितीत देशात अजूनही पाऊस सुरू आहे. पाऊस आणि पिकात पाणी साचल्याचा फटका कंद फुटीवर बसण्याची शक्यता आहे. या साऱ्यामुळे परिणाम उत्पादनावर होईल, असाही अंदाज व्यक्त केला आहे. सततच्या पावसामुळे अगोदरच हळदी पीक धोक्यात आले आहे. त्यातच असाच पाऊस सुरू राहिल्यास पीक परिस्थिती अजूनही बिकट होवू शकते..Turmeric Futures Ban : हळदीच्या वायदेबंदीची मागणी कितपत योग्य?.महाराष्ट्रातील चित्रपश्चिम महाराष्ट्रात ऑगस्टच्या मध्यावर पाऊस झाला. ऐन वाढीच्या काळात पावसाने हजेरी लावल्याने हा पाऊस हळद पिकास उपयुक्त ठरला आहे. या पावसामुळे हळद पिकाचे नुकसान झाले नाही. मात्र, सांगली, सातारा या दोन्ही जिल्ह्यांच्या नदीकाठच्या गावांतील हळद पिकाला काही प्रमाणात पुराचा फटका बसला आहे. तर मराठवाड्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने हळद उत्पादक शेतकरी बेजार झाला आहे. विदर्भात काही अंशी पावसाचे प्रमाण कमी आहे. या भागातील पीक चांगले असल्याचा दावा हळद संशोधन केंद्राने केला आहे. एकंदर पाहता, राज्यात या पावसाचा अंदाजे १० टक्के पीक बाधित झाल्याचे सांगितले..सर्वाधिक फटका तेलंगणा, तमिळनाडू, आंध्र प्रदेशलातेलंगणा, तमिळनाडू, आणि आंध्र प्रदेश या तीनही राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे बहुतांश भागात पाणीही साचून राहिले आहे. त्यातच नदीकाठची हळदीचे पीक पुरामुळे वाहून गेले असल्याचा दावा हळद संशोधन केंद्राने केला आहे. परिणामी या तीनही राज्यांतील हळद पीक धोक्यात आले असल्याचे चित्र आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे या राज्यातील सुमारे १५ टक्क्यांपर्यंत हळदीचे नुकसान झाल्याचा अंदाज संबंधित विभागाने व्यक्त केला आहे..सततच्या पावसामुळे देशातील हळदीची पीक परिस्थिती पाहता नुकसानीची स्थिती २५ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. परंतु अशीच परिस्थिती राहिल्यास नुकसानीची टक्केवारी वाढले असा अंदाज आहे.डॉ. मनोज माळी, प्रभारी अधिकारी, हळद संशोधन केंद्र, कसबेडिग्रज, जि. सांगली.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.