Sant Tukaram Maharaj Palkhi: आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोमवारी (ता. २०) सोलापूर जिल्ह्यात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. पुणे जिल्ह्याची हद्द ओलांडून सोहळा सराटी (ता. माळशिरस) येथे पोहोचताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्रींच्या पादुकांचे व अश्वाचे पूजन करून पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी नीरा नदीवरील पुलावरून जेसीबीच्या साहाय्याने पालखी रथावर भव्य पुष्पवृष्टी करण्यात आली..पुणे जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी उत्तम दिघे यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडे पालखी सोहळ्याची सूत्रे अधिकृतपणे सुपूर्द केली. स्वागत समारंभानंतर जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी पालखी रथाचे सारथ्य केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. .Wari 2026: वारी : महाराष्ट्राच्या लोकमनाची अद्भुत परंपरा.स्वागतस्थळी संध्या तिवारी आणि त्यांच्या पथकाने सादर केलेल्या भारुडाने भाविकांना मंत्रमुग्ध केले. तसेच मराठी चित्रपट व मालिकांतील अभिनेते भाऊ कदम तसेच अभिनेत्री शिवानी परब आणि संजना काळे यांनीही पालखी सोहळ्यास उपस्थित राहून पादुकांचे दर्शन घेतले..वारकऱ्यांसाठी ‘आरोग्य बाईक’ आणि ‘मुख्यमंत्री आरोग्य रथ’पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी जिल्हा प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी ‘मुख्यमंत्री आरोग्य रथ’, विशेष आरोग्य उपचार केंद्रे तसेच तातडीच्या मदतीसाठी ‘आरोग्य बाईक’ तैनात करण्यात आल्या आहेत. माता-बालकांसाठी ‘हिरकणी कक्ष’, शुद्ध पिण्याचे पाणी, तात्पुरती स्वच्छतागृहे आणि निवारा केंद्रांचीही व्यवस्था करण्यात आली असून, अधिकाऱ्यांनी त्याची प्रत्यक्ष पाहणी केली..Ashadhi Wari: जिल्हाधिकाऱ्यांकडून पालखी मार्ग, तळांची पाहणी.पुरंदावडेत माउलींचे पहिले गोलरिंगणसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोलरिंगण सोमवारी (ता. २०) माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे येथे भक्तिमय वातावरणात पार पडले..सोमवारी सकाळपासूनच पुरंदावडे परिसरात गर्दी उसळली होती. टाळ-मृदंगाचा गजर, अभंग-भजन आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘माउली-माउली’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. माउलींच्या पालखी सोहळ्यातील या पारंपरिक गोल रिंगणाचा सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून आलेल्या वारकऱ्यांनी गर्दी केली होती. रिंगण सोहळा सुरळीत पार पडावा, यासाठी ग्रामस्थ, पालखी सोहळा व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासनाने आवश्यक नियोजन केले होते. वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आणि अन्य सेवांची व्यवस्था केली गेली होती..रिंगण सोहळ्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी माळशिरस मुक्कामी रवाना झाली. मंगळवारी (ता. २१) पालखी सोहळा वेळापूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.