Kolhapur News : आता गाव, पाणंद रस्त्यांना ओळख क्रमांक मिळणार आहेत. त्यामुळे रस्त्याच्या वापरावरून होणारे वाद आता कमी होणार आहेत. या रस्त्यांवरील अतिक्रमणेही निघणार आहेत. गावात किती पाणंद, गाडी व ग्रामीण मार्ग यांची यादी गावपातळीवर तलाठी दफ्तरी उपलब्ध होणार आहे. याबाबतची कार्यवाही छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत पंधरवड्यात करण्यात येणार आहे..सध्या गाव रस्ते, पाणंद रस्ते, गाडी मार्ग, पाय मार्ग सध्या गाव नकाशांमध्ये आहेत. मात्र, काही रस्त्यांची नोंद दप्तरी नसल्याने स्थानिक पातळीवर या रस्त्यांच्या वापराबाबत तक्रारी येत असून, काही ठिकाणी अतिक्रमणेही झाली आहेत. या पार्श्वभूमीवर भूमिअभिलेख विभागाने रस्त्यांचे वर्गीकरण करून त्याची अधिकार अभिलेखातील नोंद करण्याचे ठरविले आहे. .Panand Road: शेतरस्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सेवा पंधरवडा.यापूर्वी झालेल्या मूळ जमाबंदी सर्वेक्षणावेळी तयार केलेल्या नकाशांमध्ये, तसेच एकत्रीकरण योजनेवेळी तयार केलेल्या गटांच्या गाव नकाशांमध्ये अस्तित्वात असलेले गाव रस्ते, पाणंद रस्ते, गाडी मार्ग, पायमार्ग दर्शवले आहेत; परंतु त्यानंतर वेळोवेळी केलेल्या नवीन रस्त्यांच्या नोंदी गाव दप्तरी नाहीत. याची नोंद करण्यासाठी आता ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल व पोलिस पाटील यांच्या मदतीने रस्त्यांची यादी तयार करण्यात येईल..त्यानंतर या रस्त्यांची माहिती नवीन गट व नमुना तलाठी दफ्तरात समाविष्ट केली जाईल. त्यानंतर या रस्त्यांना क्रमांक दिले जातील. जिल्हा, तालुका व गावाचा प्रत्येकी एक कोड असेल. त्यानंतर रस्त्यांची रुंदीची नोंद पाहून ए, बी, सी, डी असा कोड दिला जाईल. त्यानंतर गावस्तरावर रस्त्यांची यादी करून ती ग्रामसभेसमोर ठेवली जाईल. येथे गाव नमुना एक-फ करून तो तलाठीस्तरावर मिळेल..Farm Roads: शेतरस्ते, पाणंद रस्त्यांना मिळणार क्रमांक.जेणेकरून रस्त्यांची यादी गावस्तरावर राहील. तो रस्ता कोणत्या सर्व्हे क्रमांकाजवळ आहे याची नोंद होईल. एकंदरीत या रस्त्यांची सर्व माहिती गावस्तरावर जतन करून ठेवली जाणार आहे. या रस्त्यांची नोंद सात-बारा उताऱ्यावरही होणार आहे..यामुळे रस्त्याच्या वापरावरून होणारे वाद कमी होण्यास मदत होईल. अतिक्रमणही निघेल. महसूल प्रशासनालाही रस्ते कोठे आहेत, याची माहिती उपलब्ध होईल.जिल्ह्यातील सुमारे ५०० पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त झाले आहेत..राज्य सरकारने सेवा पंधरवड्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. यामध्ये दिलेल्या निर्देशानुसार गाव, पाणंद, ग्रामीण रस्त्यांची माहिती संकलित करून त्यांना क्रमांक दिले जाणार आहेत. त्यानंतर या रस्त्यांची सर्व माहिती गावस्तरावर जतन करून ठेवली जाणार आहे. ही कार्यवाही १७ सप्टेंबरपासून पंधरवड्यात केली जाणार आहे.- अमोल येडगे, जिल्हाधिकारी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.