New Delhi News: अमेरिकेकडून भारतावर लादण्यात आलेले वाढीव आयातशुल्क आणि दंडाविरोधात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज उघडपणे नाराजी व्यक्त केली. अमेरिकी सरकारचा निर्णय अनुचित आणि अवास्तव असल्याचे त्यांनी म्हटले आहे..‘‘अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर एवढ्या उघडपणे याआधीच्या कोणत्याही अध्यक्षांनी भाष्य केले नव्हते,’’ अशी सूचक टिप्पणी करतानाच त्यांनी शेतकरी हिताशी भारत कधीही तडजोड करणार नाही, असे ठणकावून सांगितले..India US trade deal: आयात शुल्क वाढीमुळे भारतातून निर्यात कमी होण्याचा धोका.दिल्लीत झालेल्या ‘इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर फोरम’ या कार्यक्रमामध्ये बोलताना परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले, की ‘‘अमेरिकेशी व्यापार कराराच्या वाटाघाटी थांबलेल्या नाहीत. त्या सुरूच आहेत. अर्थात, अमेरिकेशी व्यापार कराराच्या वाटाघाटी करताना भारताने काही मर्यादा आखून घेतल्या आहेत..US India Trade Tension: अमेरिकेचा दबाव भारत झुगारणार का?.त्यामुळे आपण यशस्वी ठरलो की अपयशी ठरलो याबद्दल बोलणाऱ्यांना उत्तर आहे की सरकार म्हणून आपण आपल्या शेतकऱ्यांच्या आणि लहान व्यावसायिकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यांच्या हिताशी भारत कधीही तडजोड करणार नाही.’’.या वाटाघाटींमध्ये अमेरिकेतील डेअरी उत्पादने, पोल्ट्री उत्पादने, मका, सोयाबीन, गहू, इथेनॉल, फळफळावळ, सुकामेवा यांसारख्या कृषी उत्पादनांच्या खरेदीसाठी ट्रम्प सरकार भारतावर दबाव आणत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.