Jalna News: वर्षे उलटून गेले तरी ऊस शेतातच उभा असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. वयोमर्यादा वाढल्याने उसाला तुरे आले आहे. परिणामी उत्पादनात मोठी घट होणार असून कारखान्याची तोड कधी येणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. .जिल्ह्यात ३८ हजार हेक्टरवर उसाची लागवड केलेली आहे. यामध्ये अंबड, घनसावंगी, परतूर आणि भोकरदन तालुक्यात सर्वाधिक ऊस लागवड आहे. .Sugarcane Flowering Issue: नांदेडमध्ये ऊस आता तुऱ्याला आला.यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. दरम्यान, नगदी पीक म्हणून पाहिले जात असलेल्या उसालाही आता तोड लवकर येत नसल्याने उसाला मोठ्या प्रमाणात तुरे फुटले आहेत. .Sugarcane Flowering: तुऱ्यामुळे ऊस उत्पादन घटते का? वेळीच करा उपाययोजना.कारखान्यांनी ऊस तोडून न्यावा, यासाठी शेतकरी वर्ग प्रयत्न करताना दिसत आहे. ऊस लागवड करून १५ महिने झाले आहेत. .मात्र, अद्यापही ऊसतोड झाली नाही. परिणामी उसाला तुरे लागले आहेत. यामुळे उसाच्या वजनात घट येणार आहे. प्रोग्रामला नाव येऊन देखील कारखाना ऊस तोडायला तयार नाही. संबंधित अधिकारी शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. लवकरात लवकर ऊस तोडून जावा, यासाठी आम्ही प्रत्येक कारखान्याच्या ऊस तोड टोळीला विचारपूस करत आहोत.- गोपाल नाझरकर, शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.