Kolhapur News: इचलकरंजी येथील पंचगंगा नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी होत आहे. तर दुसरीकडे जलपर्णी वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यावर वेळीच उपाययोजना न केल्यास पुढील काही दिवसांत संपूर्ण नदी पात्र जलपर्णीने व्यापण्याची शक्यता आहे..जलपर्णीमुक्त नदीपात्र राहण्यासाठी महापालिकेने यापूर्वी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही दरवर्षी जलपर्णीचा प्रश्न त्रासदायक ठरत आहे..Water hyacinth : जलपर्णी डोकेदुखी नसून आहे उत्पन्नाचे साधन! कसे कमवाल पैसे.धरणातून पाणी सोडल्यामुळे पंचगंगा नदी पाणी गेले काही दिवस प्रवाहित होते. मात्र, सध्या पाण्याचा प्रवाह स्थिर आहे. तर पात्रातील पाण्याची पातळीही खालावत चालली आहे..Water Hyacinth Benefits : काजू आणि बदाम विसरा; खा 'या' वनस्पतीची पाने व्हा तंदुरूस्त.धरणांतून पाणी सोडल्याची माहिती प्रशासनाकडून दिली आहे. पण अद्याप उन्हाळा सुरू झालेला नाही. .फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच अशी स्थिती होत असेल तर पुढील ३ महिने पाणी व्यवस्थापनासाठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.