Palghar News: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावे जलसमृद्ध करण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या श्रमदानातून बंधारे बांधण्यात येत आहेत. याच अनुषंगाने एकट्या मोखाडा तालुक्यात १०० हून अधिक वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आहे, त्यामुळे टंचाईग्रस्त गावपाड्यांना दिलासा मिळणार आहे..मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मोखाड्यात वनराई बंधारे बांधण्यात येत आहे. वनराई बंधारे श्रमदान आणि लोकसहभागातून करण्यात येत आहे. जलसमृद्ध गाव ही संकल्पना शासनाने आखली आहे. .Water Conservation: दुष्काळी कडबनवाडीत पाण्यासोबतच आणली सुबत्ता.ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मोखाड्यातील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कामाला लागले आहे. कारेगाव ग्रामपंचायत येथून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. .Water Conservation: श्रमदानातून जलसंधारणाच्या कामांना वेग.येथे गटविकास अधिकारी अक्षय पगार आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी हातात टिकाव, घमेले आणि फावडे घेऊन वनराई बंधारा पूर्ण होईपर्यंत प्रत्यक्ष काम केले, त्यांना ग्रामस्थांची साथ मिळाली..२७ ग्रामपंचायतींचा सहभागया अभियानात २७ ग्रामपंचायती सहभागी झाल्या आहेत. याच अनुषंगाने तालुक्यात १०० हून अधिक वनराई बंधारे बांधण्यात येणार असून किमान दोन महिने पाणीटंचाईला आळा बसेल, जनावरांची पाण्याची समस्या सुटेल, असा विश्वास गटविकास अधिकारी अक्षय पगार यांनी व्यक्त केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.