New Delhi News: लोकसभेत निवडणूक सुधारणांवरील चर्चेच्या निमित्ताने मतदार फेर पडताळणी मोहिमेवर (एसआयआर) सवाल उपस्थित केले. एसआयआर घेण्याचा निवडणूक आयोगाला कायदेशीर अधिकार नाही, असा हल्लाबोल विरोधकांनी केला. ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांद्वारे निवडणूक घेण्याची मागणी करताना निवडणुकांच्या आधी थेट खात्यात रक्कम जमा करण्याच्या सरकारी योजनांवर बंदी आणावी, अशा सूचना विरोधकांनी केल्या. .बहुचर्चित निवडणूक सुधारणांवर आज लोकसभेत चर्चा झाली. प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी चर्चेला प्रारंभ करताना निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून निवडणूक आयुक्तांच्या निवडप्रक्रियेत संतुलनासाठी २०२३ च्या कायद्यात सुधारणा करण्याची सूचना त्यांनी केली..Loksabha Session : पिकविम्यावरून लोकसभेत विरोधकांचा प्रश्न; उत्तरात मंत्र्यांकडून मोदींचं गुणगान .सद्यःस्थितीत पंतप्रधान, विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांद्वारे नियुक्त मंत्री यांची समिती निवडणूक आयुक्तांची निवड करते. या प्रक्रियेत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश यांचा समावेश केला जावा, त्यातूनच लोकांच्या मनातील शंका दूर होतील, असे तिवारी म्हणाले. एसआयआर का घेतले जात आहे त्याची कारणे सरकारने संसदेसमोर ठेवावीत. निवडणूक आयोग मशिन रिडेबल मतदार यादी का देत नाही? असा सवालही त्यांनी केला..ईव्हीएमबद्दल मनीष तिवारी म्हणाले, की ईव्हीएममध्ये फेरफार होऊ शकतो, अशी भीती लोकांना वाटते. ईव्हीएमचा सोर्सकोड यंत्र तयार करणाऱ्या कंपनीकडे आहे की निवडणूक आयोगाकडे आहे हे सरकारने आयोगाला विचारून संसदेला सांगावे, मतदान प्रक्रियेवरील संशय दूर करण्यासाठी १०० टक्के व्हीव्हीपॅटची गणना व्हावी किंवा मतपत्रिकेद्वारे मतदान घेतले जावे, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे, अशी सूचना केली..Maharshtra Politics: सत्तेची मुजोरी चढल्याने सरकारची चर्चेकडे पाठ.त्याचप्रमाणे निवडणुकीच्या आधी लोकांच्या खातात रोख रक्कम जमा करण्याची प्रथा रुजली आहे. याचा निवडणुकीवर आणि सरकारी महसुलावरही गंभीर परिणाम होत असून याला आळा घातला जावा, पक्षांतरबंदी कायद्यात दुरुस्ती करावी अशी मागणी केली..अखिलेश यादव यांची टीकासमाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी निवडणूक सुधारणांवरील चर्चेच्या निमित्ताने सत्ताधारी भाजप आणि निवडणूक आयोगावर आडवळणाने टीका केली. निवडणूक आयोगाकडून निष्पक्ष कामकाजाची अपेक्षा आहे. मात्र तसे झाले नसल्याचा दावा करताना अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांमध्ये निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी करूनही आयोगाने दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.