Akola News: ग्रामीण भागातील शिक्षणाची आबाळ सुरु असून तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेत गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून शिक्षक नसल्याने सरकारने शिक्षणाची थट्टा मांडल्याचे दिसून येत आहे. या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंत एकूण १८५ विद्यार्थिनी शिक्षण घेत असून तीन शिक्षक पाच तुकड्या सांभाळत आहेत. दरम्यान, चार शिक्षकांची या शाळेत नियुक्ती करण्यात आली असली तरी ते अद्याप रुजू झालेले नाहीत. तर मुख्याध्यापकाचे पद गेल्या १० वर्षांपासून रिक्त आहे. .दानापूर येथे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. तीनच शिक्षकांनी सात वर्ग कसे सांभाळायचे, असा प्रश्न पालक विचारत आहेत. शिक्षकांची नियुक्ती करावी, याकरिता अनेकवेळा पंचायत समितीत गावकऱ्यांनी पाठपुरावा केला. मात्र, अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याची तक्रार शाळा समिती तसेच पालक वर्ग करीत आहेत. या संदर्भात गट विकास अधिकारी व गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे..Rural Education: समर्पित शिक्षक : संपत गर्जे.निवेदन देतेवेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष रौंदळे़, वंचित बहुजनचे तालुका उपाध्यक्ष भगवान हागे, सरपंच सपना वाकोडे, मनीषा रौंदळे, माजी सरपंच महादेव वानखडे, संतोष हागे, धम्मपाल वाकोडे उपस्थित होते.....तर पंचायत समितीत वर्ग भरवू!ग्रामीण भागातील शिक्षणाकडे विभाग दुर्लक्ष करीत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षकांची तातडीने नेमणूक करावी, या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समिती, गावकरी नागरिक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व वंचित बहुजन आघाडी व शिवसेनेच्या वतीने गट विकास अधिकारी व गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले. वेळेत उपाययोजना न झाल्यास पालकांनी आक्रमक भूमिका घेत गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या कक्षात गावातील विद्यार्थ्यांचा वर्ग भरविण्याचा इशारा दिला. तर वंचित बहुजन आघाडीने सात दिवसांत शिक्षक न मिळाल्यास शाळेला कुलूप लावण्याचा, शिवसेनेने ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे सरपंच, उपसरपंचांनी निवेदनात पंधरा दिवसांत शिक्षक न दिल्यास उपोषणाचा करण्याचा इशारा दिलेला आहे..Rural Education: शेती अन् शिक्षणासाठी‘स्किल’ची मिळाली साथ.येत्या दहा ते पंधरा दिवसात बदलीने आलेले शिक्षक शाळेत रुजू झाले नाहीत तर, पर्यायी व्यवस्था करावी. अन्यथा गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या कक्षात विद्यार्थ्यांची शाळा भरवू.- सूर्यकांत वैलकार, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, दानापूर.गावात शिक्षकाअभावी शिक्षणाचा बोजवारा वाजत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ शिक्षकांची व्यवस्था करावी, अन्यथा शाळेला ताला ठोको आंदोलन करण्यात येईल.- सुभाष रौदळे, मा.जि.प. उपाध्यक्ष.विद्यार्थ्यांच्या पालकांचे रोज शिक्षकांसाठी फोन येतात. वरिष्ठ अधिकारी व गटशिक्षण अधिकाऱ्यांनी १५ दिवसात शिक्षक पाठवावेत नाही, तर आपण उपोषण करू.- सपना धम्मपाल वाकोडे, ग्रामपंचायत सरपंच, दानापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.