Raju Shetti On Sugarcane FRP Issue: “राजा उधार झाला आणि हाती भोपळा दिला" अशी अवस्था देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झालेली आहे. पुढील २०२६-२७ हंगामात गाळपास जाणाऱ्या उसाला केंद्र सरकारने प्रतिटन ३,६५० रुपये एफआरपी जाहीर केलेली आहे. प्रतिटन १०० रुपये एफआरपी वाढविण्याचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. वाढता उत्पादन खर्च आणि महागाई लक्षात घेता केंद्राने किमान प्रतिटनामागे ३०० रुपयांची वाढ करणे अपेक्षित होते, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली आहे..केंद्राने उसाचा एक टनाचा उत्पादन खर्च १,८२० रुपये दाखवला आहे. एक टन उसाचा खर्च १,८२० रुपये आणि एफआरपी ३,६५० रुपये इतकी जाहीर केली आहे. आम्ही गेली अनेक वर्षे सरकारकडे, स्वामिनाथन आयोगाच्या सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा म्हणजे दीडपट हमीभाव देण्याची मागणी करत आहोत. पण, केंद्र सरकारने उसाचा जो प्रतिटन १,८२० रुपये खर्च दाखविला आहे; तो कोणत्या ऊस संशोधन केंद्रात अथवा विद्यापीठांत काढला, हे सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे. .Sugarcane FRP: उसाच्या एफआरपीमध्ये क्विंटलमागे १० रुपयांची वाढ.सरकारच्या म्हणण्याप्रमाणे उत्पादन खर्च १,८२० रुपये आणि ३,६५० रुपये एफआरपी धरल्यास सरकार उत्पादन खर्च अधिक १०० टक्के नफा सरकार द्यायला लागले आहे, असे म्हणावे लागेल. एवढा नफा जर शेतकऱ्यांना होत असेल तर आता शेतकरी चळवळीची गरजच राहिलेली नाही, असा टोला त्यांनी लगावला..Sugarcane FRP: साखर कारखान्यांकडे ३,५०० कोटींची एफआरपी थकीत, राजू शेट्टींची माहिती, साखर आयुक्तांची घेतली भेट.सरकारकडे संशोधन करणाऱ्या अनेक यंत्रणा आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषद, वेगवेगळी कृषी विद्यापीठे आणि ऊस संशोधन केंद्रे आहेत. या संशोधन केंद्राच्या जमिनीवर १,८२० रुपयांत एक टन ऊस पिकवू दाखवा आणि आम्ही उसाचा दरदेखील मागत नाही. हे जर सिद्ध करता येत नसेल तर देशातील शेतकऱ्यांची माफी मागा, अशा भूलथापा देणे बंद करा, कशाला शेतकऱ्यांची फसवणूक करताय? असा सवाल त्यांनी दिला आहे. .उसाचा एकरी खर्च ९७ हजार रूपयांवरवर्षभरात रासायनिक खतांचे भाव वाढले आहेत. खतांवरील अनुदान कमी केले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. सध्या एकरी जवळपास ९७ हजार रूपयांवर ऊसाचा उत्पादन खर्च जात असून यातून सरासरी ४० ते ४५ टन ऊस उत्पादन मिळते. याचाच अर्थ तोडणी वाहतूक आणि उत्पादन खर्च एकत्रित केल्यास जवळपास प्रतिटन ३ हजार रुपये खर्च होऊ लागला आहे. असे असताना केंद्र सरकार चुकीचा उत्पादन खर्च दाखवून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेत आहे. केंद्राने किमान प्रतिटन ३०० रूपये एफआरपी वाढ करणे आवश्यक होते, असे शेट्टी यांनी म्हटले आहे..आगामी २०२६-२७ गाळप हंगामासाठी ऊस एफआरपीत केंद्राकडून प्रतिटन १०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रतिटन उसासाठी ३,६५० रुपये एफआरपी मिळेल. हा दर १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी ऊस उत्पादकांना मिळणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.