Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाडा व खानदेशातील पाच जिल्ह्यातील २५ कारखान्यांनी यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभाग घेतला होता. फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या व चौथ्या आठवड्यांत त्यापैकी दोन कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपला असून उर्वरित २३ कारखान्यांमध्ये ऊस गाळप सुरू आहे. .गाळप हंगाम थांबलेले दोन्ही कारखाने नंदुरबार जिल्ह्यातील आहेत. ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यांकडे वाटचाल करत असल्याचे दिसत आहे..Sugarcane Crushing Season : मराठवाड्यासह खानदेशच्या पाच जिल्ह्यातील १० कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपला.यंदाच्या ऊस गाळप हंगामात खानदेशातील नंदुरबार, जळगाव व मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या पाच जिल्ह्यांतून सहकारी १५ व खासगी १० असे २५ कारखाने सहभागी झाले..Sugarcane Crushing Season : सांगली जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला.या कारखान्यांनी १ कोटी ९ लाख ८४ हजार ५२४ टन उसाचे गाळप केले. गाळप हंगामात सहभागी झालेल्या १५ सहकारी साखर कारखान्यांनी २४ फेब्रुवारी अखेरपर्यंत सुमारे ४७ लाख ६५ हजार ३३ टन उसाचे गाळप केले. या गाळपातून सरासरी ७.६७ टक्के साखर उताऱ्याने ३६ लाख ५६ हजार ४७० क्विंटल साखरेचे उत्पादन केले..दुसरीकडे १० खासगी साखर कारखान्यांनी ६२ लाख १९ हजार ३९१ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.४९ टक्के साखर उताऱ्याने ५२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.