Why Sugar Prices Increased Suddenly?: साखरेच्या दरातील अचानक झालेल्या उच्चांकी वाढीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. खूप कमी कालावधीत साखरेचे भाव इतक्या मोठ्या प्रमाणात वाढणे हे प्रथमदर्शनी अनैसर्गिक वाटते. इतके भाव का वाढले? याची सखोल चौकशी सरकारने करावी, अशी मागणी किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केली आहे..आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साखर तयार होते. ऊस बिलाचे पैसे देण्यासाठी कारखाने खूप लवकर साखर विक्री करतात किंवा त्याचा सौदा करतात. गोदामात साखर पडून असली तरी प्रत्यक्षात त्या साखरेवर कारखानदारांची कोणतीही मालकी नसते. सहकारी कारखान्यांचीही मालकी नसते. त्याच्यावर व्यापाऱ्याची मालकी असते. यामुळे खूप कमी साखर कारखान्याकडे शिल्लक आहे..यामुळे साखरेच्या भावातील तेजीचा फायदा हा व्यापाऱ्यांनाच अधिक होण्याची शक्यता आहे. ग्राहकांना मात्र यांचा मोठा भुर्दंड पडणार आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने याबाबत सखोल चौकशी केली पाहिजे. या प्रकरणी हस्तक्षेप केला पाहिजे. इतके भाव का वाढले? याच्याबद्दलचे स्पष्टीकरण दिले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे..Sugar Price Hike: साखरेचे दर वाढले, आता ऊस उत्पादकांना ५०० रुपयांचा दुसरा हप्ता द्या, राजू शेट्टींची मागणी.साखरेच्या वाढत्या दराचा अधिक लाभ सहकारी कारखान्यांना आणि शेतकऱ्यांना कसा होईल? यासाठी काय हस्तक्षेप करता येईल? तो हस्तक्षेप साखर आयुक्त, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने करावा, अशीही मागणी नवले यांनी केली आहे..साखरेच्या वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांना मिळावा, 'आंदोलन अंकुश'ची मागणीसाखरेच्या वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांना मिळावा. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देण्यासाठी कारखान्यांना आदेश व्हावेत, अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेने कोल्हापूर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे. ऊस दराचे विनियमन अधिनियम २०१३ नियम २०१६ मधील तरतुदीनुसार कारखान्यांना झालेल्या नफ्यातील वाटा म्हणून दुसरा हप्ता शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे..Sugar Prices: साखरेचे दर ‘उच्चांकी’.गेल्या हंगामात तुटलेल्या उसाला पहिला हप्ता म्हणून एफआरपी कारखान्यांनी दिली असली तरी दुसरा हप्ता हंगाम संपल्यावर १२० दिवसात द्यायला पाहिजे. पण काही अपवाद वगळता कोणत्याच कारखान्याने दुसरा हप्ता दिलेला नाही. त्यासाठी आदेश द्यावेत. .यावर्षी साखर व उपपदार्थांना बाजारात उच्चांकी दर मिळाले आहेत. त्यातून कारखान्यांना मोठा नफा झालेला आहे. त्यातून त्यांना आणखी पैसे देता येतात. ते पैसे तातडीने शेतकऱ्यांना द्यावेत. साखर, उपपदार्थांना उच्चांकी दर मिळालेला असेल तर शेतकऱ्यांच्या उसालाही उच्चांकी दर मिळाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे..तोडणी वाहतूक खर्चात कारखाने नियम २०१६ मधील नमूद खर्चाच्या बाहेरील खर्च समाविष्ट करून तोडणी वाहतूक खर्च दरवर्षी वाढवत आहेत. त्याबाबत तोडणी वाहतूक खर्चाला मान्यता देताना त्यामध्ये इतर खर्च वगळून मान्यता द्यावी. याबाबत आदेश शासकीय लेखा परीक्षकांना द्यावेत, अशी मागणीही आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी निवेदनातून केली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.