Sugarcane Farmers: गेल्या महिन्याच्या कालावधीत कारवाईच्या भीतीने राज्यातील अनेक कारखान्यांनी एफआरपीच्या थकीत रकमा जमा करण्यास प्रारंभ केला आहे. एप्रिलअखेर सुमारे १३०० कोटींची थकबाकी कारखान्यांकडे होती. आयुक्त पातळीवर अनेक सुनावण्या होऊन कारखानदारांना कडक समज देण्यात आल्यानंतर कारखान्यांनी रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. गेल्या पंधरा दिवसांत कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ३६९ कोटी रुपये जमा केले आहेत..२०२५-२६ च्या गाळप हंगामात राज्यातील एकूण थकीत एफआरपीचा आकडा पहिल्यांदाच १,००० कोटी रुपयांच्या खाली आला असून, तो आता ९३४ कोटींवर पोहोचला आहे..Sugarcane FRP Hike: ‘एफआरपी’त वाढीने दिलासा कुणाला?.नुकतीच आयुक्तालयात राज्यातील ३९ थकीतदार साखर कारखान्यांची विशेष सुनावणी घेतली होती. त्या सुमारास राज्यातील ९६ साखर कारखान्यांकडे एकूण १,३०३ कोटी रुपयांची एफआरपी थकीत होती. सुनावणी दरम्यान अनेक कारखान्यांनी थकीत रक्कम भरण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला होता; मात्र आयुक्तांनी मुदतीत पैसे न भरल्यास कारखान्यांवर थेट जप्तीची कारवाई करण्याचा कडक इशारा दिला होता. या कारवाईच्या भीतीने कारखान्यांनी तातडीने ३६९ कोटी रुपयांची उचल करत शेतकऱ्यांची देणी चुकती केली. या तत्परतेमुळे गेल्या दोन आठवड्यांत आणखी १३ कारखान्यांनी आपली १०० टक्के एफआरपी पूर्ण केली आहे..Sugarcane FRP: ‘एफआरपी’ वाढविताना उद्योगाचा विचार कुठे? .साखर आयुक्त कार्यालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, ३० एप्रिल २०२६ पर्यंत राज्यातील २१० साखर कारखान्यांनी १०४५.६३ लाख टन उसाचे गाळप केले आहे. वाहतूक खर्चासह एकूण एफआरपी ४०,४४६ कोटी रुपये देय होती. कारखान्यांनी प्रत्यक्ष ३९,५१२ कोटी रुपये (९७.६९ टक्के) शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले आहेत. सध्या राज्यातील ८३ साखर कारखान्यांकडे ९३४ कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे..राज्यातील एकूण २१० कारखान्यांपैकी १२७ कारखान्यांनी शेतकऱ्यांची १०० टक्के देणी भागवली आहेत. उर्वरित ८३ कारखान्यांपैकी ७० कारखान्यांनी ८० ते ९९.९९ टक्के एफआरपी दिली आहे. सात कारखान्यांनी ६० ते ७९.९९ टक्के, तर ६ कारखान्यांची एफआरपी अद्याप ६० टक्क्यांपेक्षा कमी आहे. काही कारखान्यांनी मूलभूत एफआरपीपेक्षा जास्त रक्कम दिल्याने कागदोपत्री एकूण जमा रक्कम जास्त दिसत असली, तरी प्रत्यक्ष थकीत रक्कम ९३४ कोटी रुपये आहे..निर्यातबंदीनंतर दरात पडझडउन्हाळ्यामुळे मेमध्ये साखरेला काही प्रमाणात दर असल्याने साखरेची विक्री सुसह्य झाली. याचा परिमाण रक्कम उपलब्ध करण्यावर झाल्याचे कारखानदारांनी सांगितले. निर्यातबंदीनंतर काही प्रमाणात दरात पडझड झाली आहे. अजूनही उन्हाची तीव्रता कायम असल्याने विशेष करून शीतपेय उद्योगातून मागणी कायम राहील, अशी शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.