Devendra Fadnavis Delhi Meeting News Updates: महाराष्ट्रातील साखर उद्योगाच्या प्रश्नी बुधवारी (दि. २७ मे) दिल्लीत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. यात साखर उद्योगाच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. साखरेचा किमान विक्री दर म्हणजेच एमएसपी वाढवणे, इथेनॉल कोटा वाढवणे, साखरेसाठी दुहेरी किंमत प्रणाली तयार करणे, कर्जाचे पुनर्गठण, कर्जावरील व्याजात सवलत आदी मुद्दे मांडण्यात आले. यावर पुढील १० दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली..आज दिल्लीत झालेल्या बैठकीवेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान तसेच केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते. महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्यासंदर्भात बैठक झाली. यावेळी साखरेची एमएसपी वाढवणे गरजेचे असल्याचे अमित शहा यांनी मान्य केले, असे फडणवीस यांनी सांगितले..इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्याकरिता दोन महिन्यांत त्यासंदर्भात निर्णय घेण्याचे त्यांनी मान्य केले. इंटरेस्ट सबव्हेन्शनचे पैसे तत्त्काळ देणे आणि कर्जाच्या पुनर्गठणासंदर्भात राज्य सरकारच्या सोबत काम करण्याचेही त्यांनी मान्य केले. .Sugar Industry: सरकारची साखर झोप.साखरेच्या दुहेरी किंमत संदर्भात त्यांनी एक प्रस्ताव मागितला आहे; जो आम्ही तयार केला आहे. तो प्रस्ताव आम्ही सादर करणार आहोत. हा प्रस्ताव मान्य झाल्यास साखर कारखानदारीचे अनेक प्रश्न सुटतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला..Sugar Industry Problems Solution: साखर उद्योगांसमोरील समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी समिती.या बैठकीबाबत माहिती सविस्तर देताना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, हार्वेस्टर संख्या वाढवली पाहिजे. ऊस तोडणी हा एक मोठा विषय पुढे आलेला आहे. मजूर मिळत नाहीत. हार्वेस्टरची योजना ही साखर कारखाने आणि शेतकऱ्यांसाठी यात काही बदल करता येतील का? हा मुद्दा आम्ही मांडला. शुगर डेव्हलमेंट फंड (एसडीएफ) आता बंद झालेला आहे. त्याची १ हजार ५० कोटी रुपये मुद्दल आहे. त्याचे १,५०० कोटी व्याज झाले आहे. त्याचे वन टाईम सेटलमेंट करावे आणि व्याज सर्व माफ करावे, ही मागणी मांडली. यावर अमित शहा यांनी सकारात्मक मार्ग काढू असे सांगितले..कर्जाचे पुनर्गठण होणार- हर्षवर्धन पाटील सर्वात महत्त्वाचे म्हणजे कर्जाचे पुनर्गठण होय. कर्जाचे पुनर्गठण करण्याचे त्यांनी तत्वतः मान्य केले आहे. राज्य सरकारकडून तो प्रस्ताव द्यावा. राष्ट्रीयकृत बँका, नाबार्ड, राज्य सहकारी बँक, जिल्हा बँक यांच्याकडून या कर्जाचे पुनर्गठण करण्याकरिता निश्चितपणे आम्ही दोन वर्षाचे मोरेटोरियम आणि १२ वर्षांचे त्याचे पुनर्गठन करुन द्यावे, अशा पद्धतीचे मुद्दे आजच्या बैठकीत मांडण्यात आले.साखरेच्या दराबाबत दुहेरी धोरण असावे. ग्राहकांसाठी कमी दर आणि व्यवसायिक वापर होणाऱ्या साखरेसाठी अनुदानित दर देण्याची गरज नाही. हा मुद्दा मांडण्यात आला. .साखरेसाठी दुहेरी किंमत धोरण साखरेच्या दुहेरी किंमतीबाबत अमित शहा यांनी सांगितले की, याबाबतचा सविस्तर प्रस्ताव आणून द्या आणि त्याप्रमाणे निर्णय होईल. साखर उद्योगाच्या दृष्टीकोनातून हे प्रलंबित विषय होते, त्यावर आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. येत्या १० दिवसांत या सगळ्या गोष्टींवर निर्णय होईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.