Mumbai News : यंदाचा साखर कारखान्यांचा गाळप हंगाम येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार असून त्यापूर्वी विनापरवाना गाळप हंगाम सुरू केलेल्या कारखान्यांनी गाळप तत्काळ बंद करावे, असे निर्देश प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी दिले आहेत..साखर आयुक्त कार्यालयस्तरावर विनापरवाना कारखाना हंगाम सुरू केल्याबाबतच्या काही तक्रारी आल्या आहेत. तर अनेक कारखाने गाळप हंगाम सुरू करण्याबाबत परवानगी मागत आहेत. यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे संबंधित विभागाचे नियोजन आहे. त्यासंबंधीचे आदेश लवकरच काढण्यात येणार आहेत..Sugarcane Crushing Season: गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून.त्यामुळे अद्याप एकाही साखर कारखान्यास गाळप परवाना दिलेला नाही, याची नोंद सर्व कारखान्यांनी घेऊन त्यांचा गाळप हंगाम, परवाना मिळाल्यानंतरच सुरू करावा, असे निर्देश सहसंचालकांनी दिले आहेत. .Sugarcane Season : उसाला चांगल्या दराची शेतकऱ्यांना अपेक्षा.तसेच, ज्या कारखान्यांनी विनापरवाना गाळप सुरू केले असेल त्यांनी ते तत्काळ बंद करावे, अन्यथा त्यांना चालू हंगामात गाळप परवाना देण्यात येणार नाही तसेच, त्यांच्याविरुद्ध पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा साखर सहसंचालकांनी दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.