मुख्यमंत्री मान म्हणाले, दिल्लीतील प्रदूषणासाठी पंजाबच्या शेतकऱ्यांना जबाबदार धरु नकाराज्यात आता पीक अवशेष जाळण्याच्या घटना घडलेल्या नाहीतपंतप्रधानांनी पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेली १,६०० कोटींची मदत अद्याप मिळालेली नाही.Stubble Burning: दिल्लीतील हवा प्रदूषणासाठी भाजपकडून पंजाबमधील शेतकऱ्यांना जबाबदार धरले जात आहे. या मुद्यावरुन भाजप राजकारण करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मान म्हणाले की, बाजारात सुमारे ९० लाख टन भाताची आवक होणे बाकी आहे. तसेच राज्यात आता भात पिकाचे अवशेष जाळण्याच्या घटना घडलेल्या नाहीत.."दिल्लीतील धुक्याच्या समस्येसाठी पंजाबला जबाबदार धरणे योग्य नाही. पीक अवशेष जाळल्यानंतर निर्माण झालेला धूर पंजाबहून दिल्लीच्या दिशेने जायचा असेल तर वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहायला हवे. सध्या तसे काही होत नाही. दिल्लीतील प्रदूषणासाठी पंजाबला जबाबदार धरणारे हे विसरतात की ते हरियाणा राज्य आणि राष्ट्रीय राजधानीच्या दरम्यान स्थित आहेत. राज्यातील बहुतांश पीक कापणी अद्याप झालेले नाही," असे मुख्यमंत्री मान म्हणाले..Stubble Burning: पिकांचे अवशेष जाळणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई; हमीभावावर पिकांची विक्री करता येणार नाही.पंजाबमधील शेतकऱ्यांना विनाकारण बदनाम केले जात आहे. तसेच केंद्राने पीक अवशेष व्यवस्थापनासाठी कोणताही पर्याय उपलब्ध करुन दिलेला नाही, असा दावा त्यांनी केला आहे..Stubble Burning: शेतकऱ्यांना दिलं आर्थिक पाठबळ; पंजाबमध्ये पीक अवशेष जाळण्याच्या घटनांत ८० टक्क्यांनी घट."अनेक राज्यांशी संबंध असलेल्या या प्रमुख प्रश्नाचे केंद्र सरकारला गांभीर्य नाही. राष्ट्रीय धान्यसाठ्यात पंजाबचा वाटा १७० लाख मेट्रिक टन एवढा आहे. तरीही, केंद्राने कधीही त्याचे कौतुक केलेले नाही," असे मान यांना नमूद केले..“पंतप्रधानांनी पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेली १,६०० कोटींची मदत राज्याला अद्याप मिळालेली नाही,” असे मान यांनी निदर्शनास आणून दिले..पंजाबमध्ये यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत पीक अवशेष जाळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतात पीक अवशेष जाळू नयेत यासाठी त्यांना आर्थिक मदतही दिली जात आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कॉल सेंटर सुरु करण्यात आले आहेत..पंजाब आणि इतर उत्तरेकडील राज्यांत पीक कापणीनंतर शेतातील काडीकचरा, पीक अवशेष जाळले जातात. यामुळे पर्यावरणाबाबतची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. हिवाळ्यात आगीचा धूर धुक्यात मिसळून दाट धुके निर्माण होते. यासाठी शेतात पीक अवशेष जाळण्यावर बंदी घालण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.