Jalgaon News : खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा काहीशी वाढली आहे. पेरणी सुमारे ३५ हजार हेक्टरवर झाली आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यातील पेरणी सुमारे १९ हजार हेक्टरपर्यंत असल्याची माहिती आहे. धुळे व नंदुरबारमध्ये सोयाबीनची पेरणी कमी असते. या भागात शेतकऱ्यांनी सोयाबीनऐवजी मका, कापूस आदी पिकांना पसंती दिली आहे. .सोयाबीनचे उत्पादन वाढेल, अशी अपेक्षा होती. कारण पेरणीनंतर लागलीच पाऊस आला. पेरणी यशस्वी झाली. पण फुलधारणा कालावधीतच पाऊस नाही. रोज ऊन पडत आहे. सर्वत्र पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस आल्यास सोयाबीन पिकातील उत्पादन स्थिर राहील किंवा बऱ्यापैकी मिळेल, अशी अपेक्षा आहे..Soybean Crop Loss : चार एकर सोयाबीनवर फिरविला रोटावेटर.जळगाव जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी मागील महिन्यातच बऱ्यापैकी झाली आहे. त्यात कमी कालावधीत येणाऱ्या वाणांना पसंती देण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांनी तुषार सिंचन, ठिबकच्या माध्यमातून सोयाबीनचे सिंचन करण्याची व्यवस्था केली आहे.सोयाबीनचे दर मागील खरिपात अस्थिर होते. किमान ३६०० व कमाल ४६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर अनेकांना मिळाला. नंतरही दर कमी होते. पण कापूस पीक नुकसानीचे ठरत असल्याने अनेकांनी सोयाबीनची पेरणी केली. .धुळे, नंदुरबारमध्ये पेरणी स्थिर आहे. या दोन्ही जिल्ह्यांत सुमारे १६ हजार २०० हेक्टरवर सोयाबीन आहे. जळगाव जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी १८ हजार हेक्टरवर अपेक्षित होती. परंतु पेरणी वाढली आहे. पेरणीनंतर पाऊस आल्याने पेरणी यशस्वी झाली. दुबार पेरणीची वेळ आली नाही. पण पीक ऐन वाढीच्या स्थितीत असतानाच पावसाने दडी मारली..Soybean Price: आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन भावात सुधारणा; देशात सोयाबीनचा शिल्लक साठा निचांकी पातळीवर.पीक दोन महिन्यांचेसोयाबीनची पेरणी गिरणा, तापी, वाघूर नदीच्या क्षेत्रात झाली आहे. जळगाव जिल्ह्यात सोयाबीन रावेर भागात कमी आहे. परंतु यावल, चोपडा, पाचोरा, जामनेर, भडगाव, चाळीसगाव, धरणगाव, जळगाव, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागात सोयाबीन आहे. सोयाबीन पीक अनेकांचे ५५ ते ६० दिवसांचे झाले आहे. .काहींचे पीक दोन फूट उंचीचे झाले आहे. पेरणी जूनच्या सुरवातीलाच अनेकांनी केली होती. यामुळे काही शेतकऱ्यांचे पीक बऱ्यपैकी दिसत होते. पण पाऊस हवा तसा नाही. पिकात दोन वेळेस रासायनिक खत दिले, दोनदा आंतरमशागत झाली. .अनेकांनी फवारणी दोनदा केली. काळ्या कसदार जमिनीतील पीक चांगले होते. पण त्यात फुलगळ होत आहे. कारण ऊन तापत असल्याने वाफसा नाहीसा झाला आहे. पाऊस आल्यास पीक वाचेल व उत्पादन हातील येईल, अन्यथा मोठी हानी होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.