Soybean Farming Issue: राज्याचे मुख्य खरीप पीक असलेल्या सोयाबीनवर यंदा अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटे आली असून, शेतकऱ्यांकडून उगवण क्षमतेच्या शेकडो तक्रारी येऊ लागल्या आहेत. आतापर्यंत कृषी विभागाकडे तीन हजार ६१५ तक्रारी आल्या असून, प्रयोगशाळांकडे पाठवलेले ५८१ नमुने अप्रमाणित निघाले आहेत. यामुळे ‘ॲक्शन मोड’वर आलेल्या कृषी विभागाने आतापर्यंत बियाणे कंपन्यांवर चार ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत..राज्यात यंदा ४७ लाख हेक्टरहून अधिक सोयाबीनचा पेरा होण्याची अंदाज आहे. त्यापैकी १३ जुलैअखेर ३७ लाख ३६ हजार हेक्टरवर पेरा झाला आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सोयाबीन उत्पादक शेतकरी एकूण बियाण्यांपैकी ७५ टक्के घरगुती बियाणे वापरतात. तसेच २० ते २५ टक्के बियाणे बाजारपेठांमधून घेऊन वापरले जाते. राज्यात बियाण्यांची विक्री करणाऱ्या ५० पेक्षा जास्त कंपन्या आहेत..या कंपन्यांकडून शेतकऱ्यांना सत्यप्रत बियाण्यांची विक्री केली जाते. प्रमाणित बियाण्यांप्रमाणे सत्यप्रत बियाणे शासनाच्या काटेकोर तपासणी प्रणालीत समाविष्ट नाही. खासगी कंपनी स्वतःच्या जबाबदारीवर त्यांनी उत्पादित केलेल्या सोयाबीन बियाण्याच्या विक्री पिशवीवर ‘किमान ७० टक्के उगवण क्षमता असलेले सत्यप्रत्य बियाणे’ असे लेबल लावते. खासगी कंपन्यांच्या या लेबलच्या भरवश्यावर शेतकरी बियाणे विकत घेऊन पेरा करतो..Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती.१८.५८ लाख क्विंटल खासगी बियाणे बाजारातराज्यात ‘महाबीज’सह विविध खासगी कंपन्यांनी १८ लाख ५७ लाख क्विंटल सोयाबीन बियाणे यंदा राज्याच्या बाजारपेठांमध्ये विक्रीला आणले आहे. यापैकी आतापर्यंत किती विकले गेले, यातील नेमके निकृष्ट बियाणे किती याची माहिती नसल्याने कृषी विभागदेखील संभ्रमात आहे. त्यामुळे तक्रारी असलेल्या जिल्ह्यांवर कृषी विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकांनी लक्ष केंद्रित केले आहे. सदोष बियाण्यामुळे उगवण न झाल्याच्या आतापर्यंत साडेतीन हजाराहून अधिक तक्रारी शेतकऱ्यांकडून आल्या आहेत. .यात मुख्यत्वे अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. यातही पुन्हा सर्वाधिक तक्रारी बूस्टर प्लांट जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या विरोधात दाखल झाल्या आहेत. या कंपनीविरोधात १३ जुलैअखेर ११२९ तक्रारी आल्या असून, कृषी विभागाने अकोला व अमरावती व वर्धा अशा तीन जिल्ह्यांमध्ये कंपनीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. .त्यानंतर रवी हायब्रीड सीड्स ॲण्ड रिसर्च कंपनीविरोधात ८७० तक्रारी शेतकऱ्यांकडून आल्या आहेत. या कंपनीविरोधात देखील अकोला जिल्ह्यात फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ‘महाबीज’, तसेच पार्श्व जेनेटिक्स कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांविरोधात तक्रारी येत असून क्षेत्रीय पातळीवर तपासणी सुरू करण्यात आली आहे..Soybean Seeds Fraud: पश्चिम विदर्भात सोयाबीन बियाण्यांचा ‘फसवा खेळ’!.बियाणे न उगविण्याची कारणेखासगी कंपन्यांकडून निकृष्ट बियाण्यांची विक्रीबीजोत्पादन प्रक्रियेत शास्त्रीय पद्धतीचे पालन न करणेबियाणे साठवण, वाहतूक, बीजप्रक्रियेत झालेला निष्काळजीपणा‘एल निनो’च्या प्रभावामुळे कमी व खंडित स्वरूपाचा पाऊसकमी ओलावा असताना झालेला पेराबियाण्याची खोलवर झालेली पेरणी......अशी आहे सोयाबीन बियाण्यांची स्थितीबाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेले खासगी बियाणे १८.५७ लाख क्विंटलशेतकऱ्यांकडून बियाण्यांबाबत आलेल्या तक्रारी ३६१५शासकीय समितीने तपासणी केलेल्या तक्रारींची संख्या १७३८बीजपरीक्षण प्रयोगशाळांमध्ये पाठवलेले नमुने ५६३८प्रयोगशाळांनी घोषित केलेल्या अप्रमाणित नमुन्यांची संख्या ५८१.बियाण्यांच्या तक्रारींचे पुढे नेमके काय होणार?शेतकऱ्यांकडून आलेली प्रत्येक तक्रार कृषी विभाग दाखल करून घेणार.तक्रारीची तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडून पडताळणी होणार.कंपनीच्या चुकीमुळे बियाणे न उगवल्यास तसा अहवाल समितीकडून शेतकऱ्याला मिळणार.अहवालाच्या आधारे शेतकऱ्याला ग्राहक मंचात जावे लागेल व भरपाईसाठी कंपनीविरोधात दावा दाखल करावा लागेल..जिल्हास्तरीय सर्व तक्रारींची पडताळणी झाल्यावर गंभीर स्वरूपाच्या तक्रारी कृषी विभागाकडे वर्ग होणार.कृषी विभागाकडून कंपन्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या जातील. कंपन्यांच्याविरोधात सुनावण्या घेतल्या जातील.सुनावणीअंती कंपनीला निर्दोष सोडणे/परवाना रद्द करणे/वाण रद्द करणे अशा अनुषंगाने निकाल दिला जाईल. या निकालाविरोधात कृषी आयुक्तांकडे अंतिम अपील दाखल करण्याचा अधिकार बियाणे कंपनीला असेल..सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेच्या शेकडो तक्रारी शेतकऱ्यांकडून दाखल होत आहेत. त्यातील प्रत्येक तक्रारीची शास्त्रोक्त पद्धतीने पडताळणी केली जात आहे. बियाण्यांबाबत प्रयोगशाळांकडून अहवाल मागवले जात आहेत. निकृष्ट प्रतीचे बियाणे आढळणाऱ्या कंपन्यांवर सक्त कारवाई करण्याची भूमिका कृषी विभागाने घेतली आहे.सुनील बोरकर, कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण विभाग.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.