आज आपण सोयाबीन, कापूस, तूर, हिरवी मिरची आणि ज्वारी बाजाराची माहिती घेणार आहोत.सोयाबीनचे भाव टिकूनदेशातील बाजारात मागील दोन आठवड्यांमध्ये सोयाबीनच्या भावात चांगली सुधारणा झाली आहे. विशेष भावात झालेली वाढ टिकून आहे. प्रक्रिया प्लांट्सच्या खरेदीदरात काहीसे चढ उतार सुरु आहेत. मात्र बाजारातील सरासरी दरपातळी टिकून आहे. बाजारत सध्या सोयाबीन ४ हजार ९०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. तर प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ५ हजार ४०० ते ५ हजार ५०० रुपये होते. काही बाजारांमध्ये चांगल्या सोयाबीनला ५५०० रुपयांचाही भाव मिळत आहे. तर बियाणे दर्जाचे सोयाबीन ६ हजार ते ७ हजाराने विकले जात आहे. सोयाबीनमधील वाढ टिकून राहण्याची शक्यता असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे. .कापूस स्थिरवलाकापसाचे भाव मागील दोन दिवसांपासून स्थिरावले आहेत. सीसाआयने कापसाची विक्री सुरु केली आहे. यामुळे उद्योगांना कापूस मिळत आहे. एकीकडे बाजारात सीसीआय कापूस खरेदीतही कायम आहे. त्यामुळे सीसीआयच्या खरेदीने बाजारभावाला आधार तयार झाला तर सीसीआयच्या कापूस विक्रीने दरावढीवरही मर्यादा आल्या आहेत. सध्या कापसाचा सरासरी भाव ७ हजार ९०० ते ८ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहे. बाजारातील कापसाची आवक कमीच आहे. त्यामुळे कापूस बाजाराला आधार तयार झाला आहे. काही दिवस कापूस बाजार स्थिर राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये वाढ, कापूस दर स्थिरावले, मक्याचा भाव दबावातच, शेवगा दरात नरमाई, तुरीच्या दरात सुधारणा.तुरीच्या भावात सुधारणादेशातील बाजारात तुरीच्या भावातील सुधारणा कायम आहे. देशातील बाजारात तुरीची आवक कमीच आहे. तर दुसरीकडे तुरीला चांगली मागणी आहे. याचा आधार तुरीच्या भावाला मिळत आहे. तुरीचा भाव देशातील बाजारात ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान पोचला आहे. राज्यात तुरीची हमीभावाने खरेदी होणार आहे. त्यासाठी नोंदणीला सुरुवात झाली आहे. हमीभाव खरेदीचा खुल्या बाजारात भाव वाढीला आधार मिळणार आहे. यामुळे तुरीच्या भावातही सुधारणा होण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Agrowon Podcast: मुगाचा भाव दबावातच; सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा, कापूस भाव स्थिरावले, मेथी दबावातच तर भेंडीचे दर टिकून.मिरची आवक टिकूनराज्यातील बाजारात हिरव्या मिरचीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. मिरचीची बाजारातील आवक गेल्या काही महिन्यांपासून एका पातळीच्या पुढे सरकलेली नाही. तर दुसरीकडे हिरव्या मिरचीला चांगला उठाव आहे. यामुळे दर टिकून आहेत. सध्या हिरवी मिरची सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकली जात आहे. मिरचीची बाजारातील आवक पुढील काही दिवस कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिरव्या मिरचीचा भाव टिकून राहू शकतो, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे..ज्वारीचे दर टिकूनराज्यातील बाजारात ज्वारीचे दर मागील महिनाभरापासून टिकून आहेत. बाजारातील ज्वारीची आवक कमी झालेली आहे. तर ज्वारीला उठावही मिळत आहे. सध्या राज्यात ज्वारीला गुणवत्ता आणि वाणानुसार दर मिळत आहे. मालदांडी ज्वारी पुणे आणि मुंबईत ५ ते ६ हजाराने विकाली जात आहे तर इतर बाजारांमध्ये ३ हजार ते ४५०० रुपये दर आहेत. दादर ज्वारी ३ हजार ते ३५०० रुपयाने विकली जात आहे. शाळू ज्वारीलाही ३ हजार ते ३५०० रुपये भाव मिळत आहे. पांढरी ज्वारीला ३५०० ते ४ हजारांचा भाव मिळत आहे. ज्वारीचे दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्ते केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.