Nagpur News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनासाठी आणलेल्या सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दिवस वीजपुरवठा मिळत असून, ही सर्वांत मोठी विकेंद्रित सौरनिर्मिती योजना असून, आगामी काळात जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना महावितरणच्या माध्यमातून दिवसा वीज मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले..नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील चार मेगावॉटच्या सौर प्रकल्पास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देऊन सौर प्रकल्पाची पाहणी केली. या वेळी ते बोलत होते..Agriculture Solar Scheme : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या कामांना वेग द्या.शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यासह नाशिक जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत..Solar Agri Pump: कृषिपंपांचे सौर ऊर्जाकरण डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार.महावितरण व आवादा कंपनीमार्फत मोहाडी येथे चार मेगावॉट व आंबे दिंडोरी येथे दोन मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झालेला आहे. या दोन्ही प्रकल्पांतून निर्माण होणारी वीज महावितरणच्या ३३/११ केव्ही मोहाडी उपकेंद्र येथे पोहोचवली जाते..या सौरऊर्जा प्रकल्पामुळे मोहाडी उपकेंद्रातील मोहाडी, वरवंडी, शिवनई व कुरनोळी या ११ केव्ही विद्युत वाहिनीमार्फत मोहाडी, कुरनोळी, शिवनई, वरवंडी, आंबे दिंडोरी व गणोरवाडी या गावातील दोन हजार ९४० शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा सकाळी नऊ ते पाच या वेळेत अखंडित व पुरेशा दाबाने थ्री फेज वीजपुरवठा दिला जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.