Solapur News: ऑगस्ट–सप्टेंबरमधील महापुरात जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्यानंतर अखेर शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून आर्थिक दिलासा मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील २०,४२१ बाधित शेतकऱ्यांसाठी ५७ कोटी ५८ लाख ९८ हजार रुपये मदत मंजूर करण्यात आली असून, ही रक्कम लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणारआहे..महापूर आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागांत जमीन खरडून जाणे, गाळ साचणे, जमीन वाहून जाणे, अशा प्रकारचे नुकसान झाले होते. साधारण यामध्ये १२,४६० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची नोंद प्रशासनाने केली आहे..Farmer Relief Fund: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४४ हजार कोटींचे पॅकेज दिले: अजित पवार.महापुराचा अशा पद्धतीने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्यभरातील पूरग्रस्तांसाठी ३१,५०० कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार ही मदत मिळत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.