Solapur News: यंदाच्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व लघू, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला असून, अनेक प्रकल्प शंभर टक्के क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला असून, आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची शक्यता कमीच भासणार आहे. .यंदा सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. ओढे-नाले ओसंडून वाहिले, रस्ते बंद झाले, तर शेकडो हेक्टरमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र दुसरीकडे या पुराच्या पाण्यामुळे सीना नदीसह विविध प्रकल्पांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त साठा निर्माण झाला..Water Storage: मध्यम, लघू सिंचन प्रकल्पांमध्ये मुबलक साठा.परिणामी, जिल्ह्यातील भूजल पातळी तब्बल २ ते ३ मीटरने वाढली असून, अनेक ठिकाणी विहिरी, पाझर तलाव ओसंडून वाहताना दिसत आहेत. परिणामी गावांच्या पाणीपुरवठा योजनाही पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. शिवाय पाणी योजनांच्या विहिरीही आज पाण्याने तुडुंब आहेत..Water Storage: अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांत ८४ टक्के जलसाठा.दरवर्षी मार्च ते मे या काळात जिल्ह्यातील अनेक गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येते. त्यासाठी ४० ते ५० कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार करावा लागतो. मात्र यंदा बहुतेक गावांमध्ये पाणी उपलब्ध असल्याने टँकरची गरज भासणार नाही..बहुतांश प्रकल्प शंभर टक्क्यांवर जिल्ह्यात ५५ लघू आणि आठ मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी सर्व लघू प्रकल्पातील पाणीसाठा १०० टक्क्यांच्या घरात आहेत. तर मध्य प्रकल्पापैकी आष्टी प्रकल्प केवळ ९१.१३ टक्के इतका आहे. पण एकरुख, हिंगणी, जवळगाव, मांगी, बोरी, तरडगाव, ढाळेपिंपळगाव हे प्रकल्प शंभर टक्क्यांवर आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.