Mahavitaran Smart Meter Controversy: राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटर योजनेविरोधात शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक भूमिका घेत गुरुवारी (ता. २३) महावितरणच्या सुधागड विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले. .पोस्ट-पेड स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी, ग्राहकांना मीटर निवडीचे स्वातंत्र्य द्यावे आणि स्मार्ट मीटरमुळे आलेली अवाजवी व भरमसाठ वीज बिले पूर्णपणे माफ करावीत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. निवेदनात स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांची पूर्वसंमती घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला..Smart Electricity Meter: स्मार्ट वीजमीटर मोहिमेला स्थगितीची मागणी.तसेच महावितरणकडून विविध खासगी कंपन्यांमार्फत ही कामे केली जात असून, ग्राहकांमध्ये या मीटरबाबत नाराजी वाढत असल्याचे नमूद करण्यात आले. स्मार्ट मीटरमुळे वीज वापराच्या नोंदीत वाढ होऊन ग्राहकांवर भार पडत असल्याचाही दावा करण्यात आला..Smart Meter Installation: विनापरवानगी स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध.या वेळी किसनराव उमटे, अतिष सागळे, नरेश बैकर, सुधीर साखरले, राहुल दिघे, नरेश भोईर, नितेश देशमुख आणि संदेश पवार उपस्थित होते..निवेदनात वीज कायदा २००३ मधील कलम ५५ चा उल्लेख करत दोषरहित मीटर उपलब्ध करून देणे ही वीज वितरण कंपनीची जबाबदारी असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच स्मार्ट मीटर बसविणे ही ग्राहकांसाठी ऐच्छिक बाब असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयाचा हवाला देत, ग्राहकावर सक्ती करू नये, अशी मागणी करण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.