Chandrapur MIDC Issue: पिढ्यानपिढ्या उपजीविकेचा आधार असलेली शेती औद्योगिक प्रकल्पासाठी अधिग्रहित होणार असल्याच्या भीतीने गोंडपिंपरी तालुक्यातील बारा गावांतील शेतकरी आक्रमक झाले आहेत. ‘काहीही झाले तरी शेती देणार नाही,’ अशी ठाम भूमिका घेत शेतकऱ्यांनी आंदोलनासोबतच कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, प्रशासनाच्या निर्णयाविरोधात आक्षेप अर्ज दाखल करण्यासाठी शेतकरी उपविभागीय कार्यालयात धाव घेत आहेत..या पार्श्वभूमीवर ८ मे रोजी बोरगाव येथे पहिली शेतकरी परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार असून, अधिग्रहण प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरील गोंडपिंपरी तालुक्यातील करंजी परिसरात एमआयडीसीमार्फत सुमारे १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला औद्योगिक प्रकल्प प्रस्तावित आहे..Farmers Protest: गोंडपिपरीत एमआयडीसी विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार .या प्रकल्पासाठी सुमारे १० हजार एकर सुपीक शेती अधिग्रहित केली जाणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. ‘आम्हाला उद्योग नको, आमची शेतीच हवी,’ अशी भूमिका बारा गावांतील शेतकऱ्यांनी घेतली आहे. सुरजागड आणि कोनसरी येथील प्रकल्पांमुळे तेथील शेतकऱ्यांची झालेली फसवणूक आम्ही पाहत आहोत. तीच चूक पुन्हा करणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..शेतकऱ्यांचा आरोप आहे की, अधिग्रहण प्रक्रियेची माहिती शेवटच्या क्षणापर्यंत देण्यात आली नाही. अचानक माहिती समोर आल्यानंतर हजारो शेतकरी भूमिहीन होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी एकता संघर्ष समितीच्या माध्यमातून जातीय वर्गवारीनुसार माहिती संकलनाचे काम सुरू असून, शेतकरी आक्षेप अर्ज दाखल करत आहेत..MIDC Project: कृषी विद्यापीठाच्या एक हजार एकर जागेवर राहुरीत ‘एमआयडीसी’ .बोरगाव येथे होणाऱ्या परिषदेला प्रा. डॉ. सुरेश माने अध्यक्षस्थानी राहणार असून, प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर उद्घाटक असतील. यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सदस्य अरुण लाटकर तसेच ॲड. दीपक चटप मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांच्या मते, अधिग्रहण प्रक्रियेसाठी ९० दिवसांचा कालावधी अपेक्षित असताना केवळ ३० दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न अन्यायकारक आहे..‘कुठल्याही परिस्थितीत शेती देणार नाही,’ अशी भूमिका शेतकरी संघटनांनी पुन्हा स्पष्ट केली आहे. शेतकरी एकता संघर्ष समितीने पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची भूमिका जाहीर केली. यावेळी राजेश कवठे, शालीकराम माउलीकर, कमलेश निमगडे, ॲड. सचिन फुलझेले, रामकृष्ण सांगडे, राहुल सोनटक्के, मारोती पाटील भोयर, दत्तू धुसे, विनोद दुर्गे, गणेश कोटनाके, भारत धंदरे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते..‘वावर हीच पॉवर’सुरजागड आणि कोनसरी प्रकल्पांसाठी हजारो हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली. त्याबदल्यात काही मोबदला आणि कामगारांची नोकरी देण्यात आली. मात्र, ‘‘पूर्वी स्वतःच्या शेतात मेहनत करून लाखोंचे उत्पन्न घेणारे शेतकरी आज १० ते १२ हजार रुपयांवर मजुरी करत आहेत,’’ अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. ‘‘ वावरच आमची पॉवर आहे. शेती भांडवलदारांच्या घशात घालून आम्हाला गुलाम व्हायचे नाही,’’ असे सांगत शेतकऱ्यांनी एमआयडीसीला तीव्र विरोध दर्शविला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.