Agriculture Leadership : अहिल्यानगर निसर्गाचा लहरीपणा आणि व्यवस्थेची उदासीनता यामुळे शेतकरी चहूबाजूंनी संकटात सापडला आहे. केवळ सरकारकडे बोट दाखवून प्रश्न सुटणार नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले..अकोले (जि. अहिल्यानगर) येथे राष्ट्र सेवा दलातर्फे अकोले येथे दशरथ सावंत यांचा शेट्टी यांच्या हस्ते ‘शेतकऱ्यांचा आसूड’ पुरस्काराने भव्य सन्मान करण्यात आला..Nashik Onion Farmer Crisis: कांद्याला कवडीमोल भाव, नाशिकमधील शेतकऱ्याचा बळी घेतला, राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया .या वेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना राजू शेट्टी म्हणाले, की आज शेतकरी हतबल झाला असून, धोरणांच्या जाळ्यात अडकला आहे. अशा परिस्थितीत सावंत यांच्यासारखे नवे नेतृत्व तरुण पिढीतून घडणे आवश्यक आहे. कोणत्याही पदाची अथवा पक्षाची अपेक्षा न ठेवता सावंत यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे काम केले. हाच त्यांच्या कार्याचा खरा मानबिंदू आहे..Farmers Literature Conference: शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत : डॉ. तिडके.शेतकरी, तरुण आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घ्यावी. शेतकऱ्यांसह सगळेच अडचणीत आहेत. केवळ सरकारकडे पाहून चालणार नाही तर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा..सुशिला दादासाहेब रुपवते, ॲड. संघराज रुपवते, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी, शिक्षक नेते हिरालाल पगडाल, किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले, कॉम्रेड कारभारी उगले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.