बिद्री कारखान्याकडून २०२५-२६ हंगामासाठी ऊसदर जाहीर प्रतिटन ३,४५२ रुपये विनाकपात पहिली उचल देण्याचा निर्णय हा राज्यातील उच्चांकी ऊसदर असल्याचा दावा.Bidri Karkhana Sugarcane Price: कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ हंगामासाठी ऊसदर जाहीर केला आहे. त्यांनी प्रतिटन ३,४५२ रुपये विनाकपात पहिली उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या हंगामात बिद्री कारखान्याने प्रतिटनास ३,३७० रुपये दर दिला होता. त्यांनी यंदाही उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवली आहे. .यंदाच्या गाळप हंगामासाठी प्रतिटन ३,४५२ रुपयाप्रमाणे विनाकपात पहिली उचल देण्यात येईल, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांनी आज बुधवारी (दि. २९) केली. ही पहिली उचल हा अंतिम ऊसदर नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कारखान्याच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली..Kolhapur Sugarcane Price Protest: कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदराच्या आंदोलनाला हिंसक वळण, ३ ट्रॅक्टर पेटवले .यावेळी पाटील म्हणाले, “गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खते, औषधे, इंधन आदींचे दर प्रचंड वाढले आहेत. ऊस उत्पादन खर्चही झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे साखरेचा हमीभाव वाढविणे आणि शेतकऱ्यांच्या उसास योग्य दर देणे काळाची गरज आहे. बिद्री साखर कारखान्याने नेहमीच काटकसरीचे धोरण अवलंबून, शेतकऱ्यांना उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. म्हणूनच या हंगामात गाळपास येणाऱ्या उसास प्रतिटन ३,४५२ रुपयाप्रमाणे विनाकपात पहिली उचल देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. हंगाम संपल्यानंतर शासन नियमाप्रमाणे सरासरी साखर उताऱ्यानुसार शेतकऱ्यांना अंतिम ऊसदर दिला जाईल. कारखान्याने सर्व देणी वेळेवर भागवून शेतकरी, व्यापारी, कर्मचारी आणि सभासद यांचा विश्वास जपला आहे.” .Sugarcane Price Hike: योगी सरकारचा मोठा निर्णय, उसाच्या राज्य निर्धारित मुल्यात बंपर वाढ, ४६ लाख शेतकऱ्यांना फायदा.या पत्रकार परिषदेवेळी कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे, संचालक मंडळातील सर्व सदस्य, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक एस. एन. घोरपडे, तसेच सर्व विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते..शेतकऱ्यांच्या श्रमाला योग्य दाम देण्याची भूमिका कायम ठेवली आहे. यंदाच्या हंगामातही उच्चांकी ऊसदराची परंपरा कायम ठेवणार आहे, अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी ६३ व्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ प्रसंगी दिली होती. त्यानुसार त्यांनी आज ऊसदराची घोषणा केली..“यंदाच्या हंगामात १० लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तोडणी आणि वाहतुकीचे सर्व करार पूर्ण झाले आहेत. तोडणी टोळ्या आणि वाहतूक वाहनांची जादा उपलब्धता करून घेतली आहे. शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप व्हावा, यासाठी सर्व तयारी पूर्ण आहे. साखर उत्पादनाबरोबरच इथेनॉल आणि वीज निर्मिती प्रकल्पांमुळे बिद्री कारखाना पूरक उद्योगांच्या माध्यमातून आर्थिक सक्षम झाला आहे. अनेक संकटांना तोंड देत कारखान्याने प्रगती साधली आहे,” असे के. पी. पाटील यांनी म्हटले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.