Palghar News : जुलै महिन्याच्या ८ ते २० दरम्यान पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला होता, परंतु नंतरच्या काळात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाल्याने भातशेतीला जीवदान मिळाले. .लावणीच्या वेळी आणि त्यानंतर भात खाचरात पुरेसा पाणीसाठा असणे आवश्यक आहे. परंतु त्याच काळात पावसाने पाठ फिरवल्याने मुबलक पाणीसाठा भात खाचरात नसल्याने लावणी केलेल्या भात रोपांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता होती. .Paddy Farming : दर्जेदार तांदूळ उत्पादनात नाव कमावलेले आमळी.भातशेतीतून अधिक उत्पादन मिळावे. उत्पन्न व त्यातून जीवनमान उंचावण्यासाठी कसरत करावी लागत आहे. सातत्याने होणाऱ्या वातावरणातील बदल, अतिवृष्टी, गारपीट, अशा अनेक कारणांमुळे मेहनतीवर पाणी फेरले जात असल्याचे चित्र मागील काही वर्षांत दिसत आहे. .Paddy Farming: सुधारित भात वाणांच्या निवडीवर भर.डहाणूतील वाणगाव, आईना, रणकोळ, दभोण, रानशेत, चारोटी, कासा परिसरात सरी बरसत असून, भातशेतीला जीवदान मिळाले..वाया जाणारा खर्च वाचलाबहुतांश शेतकऱ्यांचे भातशेती हे उदरनिर्वाहाचे साधन असल्याने अनेक शेतकऱ्यांनी हजारोंची खते, औषधे खरेदी करून लागवड केली होती. त्यामुळे यंदा पाण्याअभावी भात उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.