Farmer Crisis: नद्यांनी वेढलेल्या शिरोळ तालुक्यात गेल्या तीन आठवड्यांहून अधिक काळ पावसाने ओढ दिल्यान शेतीसमोरील पाण्याचे संकट गडद झाले आहे. पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाला असून, उसाची वाढ खुंटण्याबरोबरच उशिरा पेरलेल्या सोयाबीनसह अन्य खरीप पिकांनाही पाण्याचा ताण जाणवत आहे.