Tapi River Project: जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवरील शेळगाव (ता. जळगाव) बॅरेज प्रकल्पात यंदा प्रथमच १०० टक्के जलसाठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील जमिनींचे आवश्यक भूसंपादन पूर्ण झाले असून, संपादित जमिनीवरील अतिक्रमणेही हटविण्यात आली आहेत. त्यामुळे यंदा पूर्ण क्षमतेने जलसाठा करणे शक्य होणार असल्याची माहिती आहे..जिल्ह्यातील तापी नदीवर शेळगाव बॅरेजचे काम सुमारे २५ वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते. तापी नदीवर जिल्ह्यात हतनूर हा भुसावळनजीकचा प्रमुख मध्यम प्रकल्प आहे. मात्र, या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्याची साठवणक्षमता कमी झाली आहे. तापी नदीच्या उगमक्षेत्रात आणि उपनद्यांच्या परिसरात चांगला पाऊस झाल्यास नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होते..Wainganga Nalganga Project: वैनगंगा-नळगंगा प्रकल्पातून फुलणार ८३ हजार हेक्टर शिवार .तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतूल येथे असून, सातपुडा पर्वतरांगांमधून वाहत येताना अनेक उपनद्या तिला मिळतात. विदर्भातून येणारी पूर्णा नदीही चांगदेव (ता. मुक्ताईनगर) परिसरात तापीला मिळते. त्यामुळे तापी नदीत मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असते..Padalse Irrigation Project: पाडळसे, बुराई सिंचन प्रकल्प रखडलेलेच.दरम्यान, तापी नदीवर पाडळसे (ता. अमळनेर) आणि शेळगाव बॅरेज प्रकल्प हाती घेण्यात आले. पाडळसे प्रकल्पाचे काम अनेक वर्षांपासून रखडले असून, तो अद्याप पूर्ण झालेला नाही. या प्रकल्पाचा लाभ अमळनेर, पारोळा, धरणगाव, चोपडा तसेच धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा परिसराला होणार आहे..भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण२०१६ नंतर शेळगाव बॅरेजचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आणि मागील वर्षी ते पूर्ण झाले. प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील जमिनींचे संपादन आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. मागील वर्षी प्रकल्पात सुमारे ५० टक्के जलसाठा करण्यात आला होता. यंदा मात्र १०० टक्के जलसाठा करण्याचे नियोजन आहे. यावल तालुक्यातील बोरावल, टाकरखेडा, वाघळूद, भोरटेक, अंजाळे, पिळोदा, पाडळसे, भुसावळ तालुक्यातील जोगलखेडा, भानखेडा, साकेगाव, सतारे तसेच जळगाव तालुक्यातील शेळगाव आणि कडगाव परिसरातील जमिनींचे भूसंपादन करण्यात आले आहे. काही संपादित जमिनींमध्ये अद्याप पिके तसेच अस्थायी गोठे असल्याने त्यासंदर्भातील आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे. प्रकल्पस्थळी पूरनियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आला आहे.....असा आहे शेळगाव प्रकल्पशेळगाव बॅरेज प्रकल्पाचे काम १९९८ मध्ये सुरू झाले होते. मात्र, विविध कारणांमुळे ते अनेक वर्षे रखडले. २०१६ मध्ये प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आणि त्यासाठी ९६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या प्रकल्पासाठी तत्कालीन आमदार हरिभाऊ जावळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. जळगाव आणि यावल तालुक्यांना या प्रकल्पाचा मोठा लाभ होणार आहे. मागील वर्षी ५० टक्के जलसाठा झाल्यानंतर परिसरातील अनेक विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. प्रकल्पाची एकूण साठवणक्षमता ४.११ टीएमसी असून, सिंचनासह विविध वापरांसाठी हा जलसाठा राखीव ठेवण्यात येणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.