Solapur News : यंदाच्या रब्बी हंगामात पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. नुकसानभरपाई मिळण्याचे बदललेले निकष, मोफत पीकविमा योजना बंद होणे आणि शेतकरी हिस्सा वाढणे या कारणांमुळे रब्बी पीकविमाधारकांची संख्या अवघ्या ६५ हजारावरच थांबली आहे..दरवर्षी रब्बी हंगामात जिल्ह्यात दोन लाख हेक्टर व त्यापेक्षा अधिक क्षेत्राचा पीकविमा भरला जातो. मात्र यंदा केवळ ९४ हजार शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज केला असून, प्रत्यक्षात सुमारे ६५ हजार शेतकऱ्यांनीच विमा भरला आहे, ही संख्या मागील वर्षांच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे. .Rabi Crop Insurance: रब्बी हंगामात पीकविम्याबाबत शेतकरी उदासीन.यंदाच्या खरीप हंगामात एक रुपयांतील पीकविमा योजना बंद झाल्यानंतर शेतकरी हिस्सा भरून अडीच लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला होता. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाही रब्बी हंगामात मात्र विमा भरण्याबाबत शेतकरी फारसे पुढे आलेले नाहीत..Rabi Crop Insurance: रब्बी पीकविम्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाठ.यंदा रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी २ कोटी ३० लाख ९० हजार रुपयांचा शेतकरी हिस्सा भरला आहे. मागील वर्षी विमा रकमेचा भार तुलनेने कमी होता. विमा कंपन्यांकडे भराव्या लागणाऱ्या रकमेतील वाढ हाही विमा न भरण्यामागील महत्त्वाचा घटक ठरत आहे..ज्वारी, कांदा, गव्हाला प्राधान्यरब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, कांदा, उन्हाळी भुईमूग आदी पिकांसाठी विमा योजना होती. त्यात यंदा सर्वाधिक ३० हजार शेतकऱ्यांनी २३ हजार हेक्टरवरील ज्वारीसाठी, २० हजार शेतकऱ्यांनी १४ हजार ७०० हेक्टरवरील कांद्यासाठी आणि २१ हजार ८०० शेतकऱ्यांनी १३ हजार हेक्टरवरील गव्हासाठी विमा उतरवला आहे. भुईमूग आणि हरभऱ्याला तुलनेने कमी प्रतिसाद मिळाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.