Sangli Farmers Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढत थेट विटा तहसील कार्यालयावर आज बुधवारी (दि. १० जून) धडक दिली. प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादन आणि ड्रोन मोजणीसाठी खानापूर तालुक्यातील नागेवाडी, माऊली, भाग्यनगरमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला. .स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार कार्यालयावर आक्रोश मोर्चा नेत संताप व्यक्त केला. या मोर्चात हजारो शेतकरी, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी विटा तहसील कार्यालयात ठिय्या मांडला. नागेवाडी परिसरात पहाटे दोन वाजता पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आल्याबद्दल शेट्टी यांनी प्रांताधिकारी विक्रम सिंह बादल यांना जाब विचारला. .काल रात्री २ वाजल्यापासूनच नागेवाडी परिसरात पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या घरात पोलीस प्रशासनाने रात्रीच्या वेळी जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर मोजणीस विरोध करणाऱ्या महिलांशी अत्यंत असभ्य वर्तन करण्यात आले, असा आरोप शेट्टी यांनी केला. लोकशाही मार्गाने आपल्या हक्काची सुपीक जमीन वाचवू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना गुन्हेगारांसारखी वागणूक देणाऱ्या खाकी वर्दीची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. .Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणावरुन सांगलीच्या नागेवाडी, भाग्यनगरमध्ये तणाव, पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये धक्काबुक्की.शासकीय अधिकाऱ्यांनी पोलिस बळाच्या जोरावर नागेवाडी येथे ड्रोनद्वारे मोजणी करण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त शेतकऱ्यांनी त्याला कडाडून विरोध केला. या संघर्षादरम्यान हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आणि संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे प्रशासनाला अखेर ड्रोन मोजणी तत्काळ थांबवावी लागली. .Shaktipeeth Highway Protest: ''पैसा नको, शेती पाहिजे, मुलांना नोकऱ्या नाहीत, खायचं काय?''; शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार, हजारो शेतकरी एकवटले.प्रांत कार्यालयासमोर झालेल्या बैठकीत राजू शेट्टी यांनी प्रांताधिकाऱ्यांना, शेतकरी प्रकल्पास जमिनीच देणार नसतील तर जबरदस्तीने संपादन करू नये आणि शासनास सदर भूसंपादनास शेतकऱ्यांचा विरोध असल्याचा अहवाल द्यावा, असे सांगितले. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार आहेत; त्या शेतकऱ्यांना पीक कर्ज अथवा इतर कर्जे नाकारण्यात येवू नये अन्यथा कार्यालयातील खुर्च्या बाहेर फेकू, असेही त्यांनी म्हटले आहे. .'शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही...'आमचा विकासाला विरोध नाही. पण केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी आणि ५० हजार कोटींच्या भ्रष्टाचारासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी ओरबाडल्या जात असतील, तर आम्ही गप्प बसणार नाही. आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही गरजेचा नसलेला शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असाही निर्धार यावेळी करण्यात आला. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.