Sangli News: सांगली जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारित आंबिया बहारातील केळी, आंबा, डाळिंब आणि द्राक्ष पिकांसाठी यंदा ६ हजार ९२७ शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले आहे. गतवर्षी ५ हजार ३८१ शेतकऱ्यांनी विमा घेतला होता. गतवर्षीच्या तुलनेत अंबिया बहरात १ हजार ५४६ ने शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे..अतिवृष्टी, पावसाचा खंड, यासह नैसर्गिक आपत्तीमुळे फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला, तर त्यांना नुकसान भरपाई मिळण्यास मदत होते. यासाठी शाससाने पुनर्रचित हवामान आधारित आंबिया बहरातील फळ विमा योजना सुरू केली आहे. द्राक्ष, डाळिंब, केळी आणि आंबा ही पिके या योजनेत आहेत. गत वर्षी ५ हजार ३८१ शेतकऱ्यांनी विमा घेवून ३ हजार ३३७ हेक्टरवरील पिकांना संरक्षण दिले होते..Fruit Crop Insurance: विमा संरक्षित केळीची पडताळणी सुरू.जिल्ह्यात यंदाच्या पुनर्रचित हवामान आधारित अंबिया बहारातील फळ पिक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले होते. तसेच गावोगावी जावून याचा प्रचार आणि प्रसिद्धीही केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी.Fruit Crop Insurance: फळपीक विमा नोंदणीस मुदतवाढ.विमा योजनत सहभागी झाले आहेत. यंदा जिल्ह्यातील ६ हजार ९२७ शेतकऱ्यांनी विमा घेत ४ हजार ५२६ हेक्टरवरील पिकांना संरक्षण दिले आहे..दुष्काळी पट्ट्यातील जत, आटपाडी आणि तासगाव या तीन तालुक्यांतील सर्वांत जास्त शेतकरी सर्वाधिक अंबिया बहारातील फळ पीकविमा योजनेत सहभागी होत असल्याचे चित्र आहे. तसेच मिरज तालुकाही पीक विमा घेण्यात पुढे आहे. द्राक्ष, डाळिंब, केळी आणि आंबा या पिकांचे नुकसान झाले तर या योजनेतून भरपाई मिळते.बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पिकांच्या सुरक्षिततेसाठी शेतकऱ्यांचा विम्याकडे काहीसा कल वाढला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.