Weather Impact: सातारा जिल्ह्यात मार्चच्या अखेरीस आणि एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या पूर्व मोसमी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, या दोन महिन्यांत झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील ५४ गावांना फटका बसला असून, एकूण २४३ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने फळबागा आणि रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे..मार्च महिन्यात झालेल्या पावसामुळे फलटण, खंडाळा आणि सातारा तालुक्यात सर्वाधिक पडझड झाली. विशेषतः फलटण तालुक्यात डाळिंबाच्या बागांचे १०७ हेक्टरहून अधिक क्षेत्रावर नुकसान झाले, तर खंडाळ्यात गहू आणि आंब्याचे मोठे नुकसान झाले. एकट्या मार्च महिन्यात ४१२ शेतकऱ्यांना या पूर्वमोसमीचा थेट फटका बसला असून १९२.२१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. नुकसानीचे हे सत्र एप्रिल महिन्यातही सुरूच राहिले..Satara Crop Damage Rain : सातारा जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस, साठवलेला कांदा पाण्यात बुडाला.पावसाने वाई, खंडाळा, फलटण, जावळी, खटाव, कऱ्हाड तालुक्यांना लक्ष्य केले. एप्रिलमध्ये ११० हून अधिक हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून यामध्ये कांदा, गहू, ज्वारी आणि भाजीपाल्याचा समावेश आहे. फलटण तालुक्यात एप्रिलमध्येही १४ हेक्टरवरील आंब्याच्या बागांना फटका बसला, तर वाई तालुक्यात १० हेक्टरवरील पिके आडवी झाली..प्रशासकीय आकडेवारीनुसार, संपूर्ण जिल्ह्यात डाळिंब (१११ हेक्टर), गहू (४७ हेक्टर), आंबा (२८ हेक्टर), ज्वारी (२१.१७ हेक्टर ) आणि कांदा (१० हेक्टर) या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सध्या तलाठी आणि कृषी विभागामार्फत पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, बाधित शेतकरी आता सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत..Satara Agriculture Loss: सातारा जिल्ह्यात गारपीट,वादळी वाऱ्यामुळे शेतीचे नुकसान.वीज अंगावर पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यूमाण तालुक्यातील तोंडले येथे वीज अंगावर पडल्याने लाला दाजी जाधव (वय ६५) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. जाधव हे नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या चारण्यासाठी डोंगराकडे गेले होते. बुधवारी दुपारी अचानक सुसाट वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचाव करण्यासाठी त्यांनी एका झाडाचा आश्रय घेतला, मात्र त्याच वेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. संध्याकाळी शेळ्या घरी परतल्या पण जाधव न आल्याने कुटुंबीयांनी रात्रभर शोध घेतला. गुरुवारी पहाटे झाडाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला..नुकसानीचा संक्षिप्त आढावा (मार्च-एप्रिल २०२६)एकूण बाधित क्षेत्र : २४३.१९, बाधित शेतकरी ६०२फलटण तालुक्यात सर्वाधिक १२४.९० हेक्टर क्षेत्र बाधित.बहुतांश तालुक्यांत पूर्व मोसमी पावसाची हजेरीवीज पडून दोन शेतकरी तसेच २५ हून अधिक शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू.ओंड येथील माझ्यासह पाच शेतकऱ्यांचे काढणीला आलेले कलिंगडांचे गारपिटीने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पंचनामे झाले असून लवकर मदत मिळावी.- प्रकाश थोरात, शेतकरी, ओंड, जि. सातारा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.