Satara News : महायुती सरकारने जाहीरनाम्यात दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख यांनी व्यक्त केली. सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने श्री. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले..निवेदनात म्हटले, की राज्यात, तसेच जिल्ह्यात सततच्या पावसामुळे खरीप हंगाम हातून गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी किमान ५० हजार रुपये तातडीने मदत द्यावी. राज्यात विविध ठिकाणी विशेषत: मराठवाड्यात मोठ्या पावसामुळे गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आदी दुभती जनावरे वाहून गेली आहेत. .Farmer Loan Waiver : कर्जमाफी ः शेतकऱ्यांची आणि कॉर्पोरेट क्षेत्राची.त्यांचे पंचनामे करून त्यानुसार १०० टक्के नुकसान भरपाई मिळावी. महायुती सरकारने सत्तेत येताना शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे, अशा काळात बँकांचे कर्ज वसुलीसाठी तगादे सुरू आहेत. .Farmer Loan Waiver : कर्जमाफी केली नाही, तर चक्का जाम आंदोलन.शासनाने हीच वेळ योग्य समजून संपूर्ण सरसकट कर्जमाफी करावी. कधी नव्हे ते राज्यातील शेतकऱ्यांचे पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे, ही परिस्थिती ओळखून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानीचे निकष बदलून माणुसकीचे दर्शन घडवावे, अशी अपेक्षाही या निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली..दरम्यान, काँग्रेसच्या वतीने निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख, राजेंद्र शेलार, बाबूराव शिंदे, प्रताप देशमुख, रजनी पवार, निवास थोरात, अजित कदम, डॉ. संतोष कदम, संदीप माने, अमोल शिंदे, अभय कारंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.