Renewable Energy: सांगली जिल्हा आता केवळ वीज वापरणारा जिल्हा न राहता ‘ऊर्जा उत्पादक जिल्हा’ म्हणून झपाट्याने पुढे येत आहे. घरांच्या छतांवरील सोलर प्रकल्प, शेतकऱ्यांचे सौर कृषिपंप, उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील सौर पॅनेल आणि खासगी ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्ह्यात सध्या सुमारे ३७० मेगावॉट सौरऊर्जेची निर्मिती होत आहे. जिल्ह्याची सरासरी वीज मागणी सुमारे ९५० मेगावॉट इतकी असून, त्यापैकी जवळपास ४० टक्के विजेची गरज स्थानिक पातळीवर पूर्ण होत असल्याने महावितरणवरील भार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. .एप्रिल महिन्यात वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील वीज मागणीने उच्चांक गाठला होता. काही दिवस ही मागणी तब्बल १०४० मेगावॉटपर्यंत पोहोचली होती. अशा परिस्थितीत सौरऊर्जा जिल्ह्यासाठी मोठा आधार ठरली. काही वर्षांपूर्वी पूर्णपणे पारंपरिक वीजपुरवठ्यावर अवलंबून असलेला सांगली जिल्हा आता हरितऊर्जेकडे वेगाने वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे..Solar Energy Project: सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दुर्गम गुहिर गाव उजळणार.घरगुती सोलार प्रकल्पांमुळे नागरिक स्वतःच्या वापराची वीज निर्माण करू लागले आहेत. उद्योग आणि व्यापारी आस्थापनांनीही मोठ्या प्रमाणात सौरऊर्जा स्वीकारल्याने दिवसाच्या वेळेतील वीज वापर अधिक स्थिर आणि स्वस्त झाला आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत सौरऊर्जेतून मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होत असल्याने ‘टाईम ऑफ डे’ योजनेअंतर्गत ग्राहकांना दरातही सवलतीचा लाभ मिळत आहे..Solar Pump Scheme: भंडारा जिल्ह्यातील शेतकरी सौर पंपांच्या प्रतीक्षेत.कृषी क्षेत्रात सौरपंप योजना ‘गेमचेंजर’ ठरत आहे. पूर्वी शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री सिंचनासाठी वीज मिळत असल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. आता सौर कृषिपंपांमुळे दिवसा नियमित वीज उपलब्ध होत असल्याने सिंचन व्यवस्था अधिक सुलभ झाली आहे. स्वतःच्या शेतात निर्माण होणाऱ्या ऊर्जेवर मोटारी चालत असल्याने शेतकऱ्यांचा विजेवरील खर्चही कमी झाला आहे.सौरऊर्जेच्या वाढत्या वापराचा आणखी एक मोठा परिणाम म्हणजे महावितरणच्या वितरण यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. हजारो ग्राहक स्वतः वीज निर्माण करू लागल्याने मुख्य वीज वाहिन्यांवरील भार कमी झाला आहे. परिणामी, व्होल्टेजचे चढ-उतार, फ्यूज उडणे आणि स्थानिक तांत्रिक बिघाडांमध्येही काही प्रमाणात घट झाली आहे..‘जगातील सर्वांत मोठ्या विकेंद्रित सौरऊर्जा प्रकल्पांद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठा केला जात आहे. अपारंपरिक ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. ऑफग्रीड सोलर पंप बसविण्यात राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे. राज्यात सौरऊर्जा निर्मितीत मोठी वाढ झाली आहे.’- अमित बोकिल, अधीक्षक अभियंता, महावितरण, सांगली.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.