Solapur News: राज्यात ‘जलजीवन मिशन’ आणि ‘स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)’ अंतर्गत कार्यरत असलेल्या सुमारे १६०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यांपासून वेतन रखडले आहे. निधी उपलब्ध असूनही प्रशासकीय दिरंगाईमुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, या गंभीर प्रश्नी आता मुख्यमंत्री कार्यालयाने दखल घेतली आहे. कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांच्या पुढाकारानंतर मुख्यमंत्री सचिवालयाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत..या कर्मचाऱ्यांची २० वर्षांची सेवा झाली आहे, तरीही पदरी उपेक्षा आली आहे, २००३ पासून टप्प्याटप्प्याने भरती झालेले हे कर्मचारी जिल्हा आणि तालुका स्तरावर पाणी व स्वच्छतेचे काम चोख बजावत आहेत. त्यांच्या परिश्रमामुळेच राज्य स्वच्छता मोहिमेत देशात अग्रेसर राहिले आहे..Jal Jeevan Mission: ‘जल जीवन मिशन’ची ३१५ कामे पूर्ण ४०० कामे प्रगतिपथावर .मात्र १ नोव्हेंबर २०१२ च्या शासन निर्णयानुसार कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांकडे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. आता तर कुटुंबांवर उपासमारीची वेळ राज्य स्तरावर निधी उपलब्ध असतानाही केवळ तांत्रिक कारणांमुळे गेल्या चार महिन्यांचे वेतन अदा करण्यात आलेले नाही..Jal Jeevan Mission: जलजीवन मिशनची ५६६ कामे निधीअभावी ठप्प.पगार नसल्याने बँकांचे हप्ते थकले असून कर्मचाऱ्यांचे सिबिल स्कोअर खराब झाले आहेत. राज्य सरकारकडे १० कोटींचा निधी मंजूर असूनही नियोजनाअभावी कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक आयुष्य टांगणीला लागले आहे..राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील कंत्राटी कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. दिवाळीतही दोन महिन्यांचे वेतन मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते. आता मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उर्वरित वेतन तातडीने मार्गी लावण्याची मागणी करणार आहोत.- मिलिंद भोसले, अध्यक्ष, कंत्राटदार संघटना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.