Jalgaon News: खानदेशात यंदा पाऊसमान चांगले राहिल्याने गिरणासह अनेर, पांझरा नदीतून रब्बीसाठी एक आवर्तन मिळाले आहे. तसेच पुढे नदीतही पाणी सोडले जाणार आहे. परंतु वाळू उपसा सुरूच आहे. पाणी जिरण्यास व पाणी अडविण्याची कार्यवाही होत नसल्याने पाऊस असूनही नदीकाठीदेखील टंचाई तयार होईल, अशी स्थिती आहे. .गिरणा, पांझरा, अनेर आदी नद्यांत बेसुमार वाळू उपशाने नदीकाठच्या विहिरी, कूपनलिकांचे पुनर्भरण होत नसल्याने जलसाठे कमी होत असल्याची स्थिती असून, ही समस्या दूर करण्यासाठी वाळू चोरी थांबविण्याचा मुद्दाही उपस्थित केला जात आहे..Girna River : गिरणा परिसरातील सर्वच बंधारे तुडुंब.गिरणा नदीत कानळदापर्यंत (ता.जळगाव) आवर्तन सोडले जाणार आहे. पण कानळदा पुढील गावांपर्यंत नदीतून पाणी पोचत नाही. या भागात बेसुमार वाळू उपसा सुरू असतो. गेले २५ ते ३० वर्षे वाळू उपसा सुरू असल्याने गिरणा नदीकाठच्या अनेक गावांमध्ये टंचाई तयार होत आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी नदीत पाणी सोडण्याची मागणी केली जाते. अन्यथा गावांच्या सार्वजनिक विहिरी, कूपनलिकांचे जलस्त्रोत आटतात, अशी भीती व्यक्त केली जाते,.Girna River Linking Project : नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पातून ३० टीएमसी पाण्याची मागणी.पांझरा नदीतूनही पाण्याची मागणी धुळे, शिंदखेडा व अमळनेर तालुक्यातून केली जाते. यंदा पाऊस चांगला झाला आहे. नदीकाठी टंचाई कमी राहणार आहे. पण वाळू उपशाने टंचाई तयार होते. कारण वाळूअभावी पाणी वाहून जाते. .ते नदीत जिरत नाही. पशुधनासह पिण्याच्या पाण्याची समस्या पुढे फारशी तयार होणार नाही. परंतु शिवारात काही कूपनलिकांचे पाणी कमी होईल. यामुळे नदीत पाणी सोडण्याची मागणी केली जाते. यंदा गिरणातून तीन वेळेस नदीत पाणी सोडले जाईल. यामुळे किमान १२० गावांमधील जलस्त्रोत टिकून राहतील, असा विश्वास शेतकऱ्यांना आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.