Grape Farming Crisis: मागील चार वर्षांत अतिवृष्टी, वाढलेला उत्पादन खर्च, रोगांचा प्रादुर्भाव या प्रमुख कारणांमुळे जिल्ह्यातील द्राक्ष शेती आजमितीस अक्षरशः कोलमडून पडली आहे. या संकटांच्या मालिकेने मागील चार वर्षांत द्राक्ष बागायतदारांचे चांगल्या उत्पन्नाचे स्वप्नच उद्ध्वस्त केले.