Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेकडो हेक्टर भातपीक अजूनही पाण्याखाली आहे. पाणथळ जमिनीतील पिकांचे नुकसान मोठे आहे. दरम्यान, झालेल्या नुकसानीचे धीम्यागतीने पंचनामे सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे..जिल्ह्यात अजूनही पाऊस थांबलेला नाही. त्यातच २१ ऑक्टोबर ते आतापर्यंत पावसाचा जोर वाढल्यामुळे पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली आहे. जिल्ह्यात ३० ते ४० टक्के पीकक्षेत्र पाणथळ आहे. या सर्व भातपिकामधून पुन्हा मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचे चित्र आहे..Paddy Crop Damage : आठ दिवसांत १९६ हेक्टर भातपिकाचे पावसाने नुकसान.सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात मागील दोन-तीन दिवसांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे या दोन तालुक्यांतील पाडलोस, मडुरा, रोणापाल, निगुडे, कास, सातोसे, न्हावेली, दांडेली, बांदा, वाफोली, इन्सुली, विलवडे ,ओटवणे, तळवडे, झोळंबे, कुडासे या गावांत शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे..Paddy Crop Damage : पावसाचा भात पिकाला फटका.या भागातील नदीनाल्यांच्या प्रवाहाचे पाणी शेतीतून गेल्यामुळे संपूर्ण पीक पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान झाले आहे. असे असले तरी कृषी विभागाकडून धीम्यागतीनेच पंचनामे सुरू आहेत. आतापर्यंत केवळ १३०० हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत..पावसामुळे ६० ते ६५ टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. दोन-तीन दिवस मुसळधार पावसामुळे शेतमळ्यांमध्ये पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे काही प्रमाणात पीक मिळण्याची शक्यता होती ते देखील आता मिळणे मुश्कील आहे. कृषी विभागाकडून अजूनही नुकसानीचे पंचनामे गतीने होताना दिसत नाहीत.आकाश नरसुले, भात उत्पादक, दोडामार्ग.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.