Raigad News: अलिबागला उरण आणि नवी मुंबईशी जोडणाऱ्या रेवस-करंजा सागरी मार्गावर २५ कोटी रुपये खर्च करून रेवस बंदरात रो-रो जेट्टी सेवा सुरू करण्यात येणार होती; परंतु कंत्राटदार काम सोडून गेल्यामुळे रेवस बंदरातील जेट्टीचे काम मागील तीन वर्षांपासून बंद आहे. .मेरिटाइम बोर्डाच्या वेळकाढू धोरणामुळे या कामासाठी अद्याप नवा कंत्राटदारही नेमण्यात आलेला नाही. यामुळे रेवस-करंजा सागरी मार्गावर तर सेवेतून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे..Janjira Fort Jetty : जंजिरा जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच खुली होणार.रेवस ते करंजा हे फक्त दीड किलोमीटरचे सागरी अंतर आहे. या मार्गावर रो-रो सुरू झाल्यास त्यामधून १५ ते २० मिनिटांमध्ये चारचाकी वाहने घेऊन प्रवास करणे शक्य आहे. रस्ते मार्गाने अलिबाग ते उरण हे अंतर कापण्यासाठी सध्या दोन ते अडीच तास लागतात. त्यामुळे रो-रोची सुविधा ही सर्वात कमी खर्चाची असल्याने या मार्गावर रो-रो सुरू करण्याची मागणी पनवेल, उरण, अलिबाग आणि मुरूड तालुक्यातील नागरिकांची आहे..Chowk Jetty : चौक जेट्टीचे काम रखडले .सध्याच्या घडीला रेवस बंदरातील जेट्टी खूपच जुनी झालेली असल्याने येथे प्रवासी नौका व्यवस्थित लावता येत नाहीत. या नौकांमध्ये चढ-उतार करताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. दुचाकी वाहने उचलून नौकांमध्ये ठेवावी लागतात, अशा वेळेला सातत्याने अपघात होत असतात..मांडवा ते गेटवेनंतर हा सर्वात रहदारीचा मार्ग असल्याने या जलमार्गावर रो-रो जेट्टी बांधावी, अशी मागणी कायमच सुरू असते. यामधील करंजा जेट्टीचे काम पूर्ण झाले; परंतु अलिबाग बाजूकडील रेवस बंदरातील जेट्टीचे काम रखडले आहे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.