Pune News: इंदापूर तालुक्यातील उजनी धरण प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या मूळ मालक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे तसेच वर्षानुवर्षे सुरू असलेल्या अन्यायाला वाचा फुटावी, या मागणीसाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अभिजित राजेंद्र तांबिले यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले आहे..हिंगणगाव, कांदलगाव व तरडगाव या तीन गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी १९७० च्या दशकात उजनी धरण प्रकल्पासाठी माती-मुरूम उचलण्याच्या प्रयोजनासाठी शासनाने संपादित केल्या होत्या..Mula and Jayakwadi project : मुळा व जायकवाडी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मोबदला जमीन मागणीचे प्रस्ताव पाठवा; विखे पाटील यांचे निर्देश.त्या काळात शेतकऱ्यांनी मोठ्या त्यागातून सुपीक शेती शासनाच्या ताब्यात दिली. मात्र त्यानंतर झालेल्या विविध धोरणात्मक बदलांमुळे व अंमलबजावणीतील त्रुटींमुळे मूळ जमीनमालक शेतकऱ्यांचे हक्क बाधित झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे..Farmers Protest: प्रकल्पग्रस्त शेतकरी आज देणार विधान भवनावर धडक.अनेक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने पाणीपट्टी भरून जमिनी विकसित केल्या असतानाही आज त्यांना जमिनीच्या मालकी हक्क व वहिवाटीबाबत गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे..यामुळे अनेक कुटुंबांची उपजीविका धोक्यात आली असून हा प्रश्न केवळ कायदेशीर मर्यादित नसून सामाजिक व मानवी दृष्टिकोनातूनही अत्यंत गंभीर असल्याचे श्री. तांबिले यांनी स्पष्ट केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.