Dhule News: साक्री तालुक्यातील जामखेली मध्यम प्रकल्पाचे कॅनॉल आणि वितरिका अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून लाभक्षेत्रातील हजारो शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. या गंभीर समस्येवर त्वरित तोडगा काढत कॅनॉलची दुरुस्ती करण्याची मागणी धाडणे (ता. साक्री) येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश अहिरराव यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली..निकृष्ट कामामुळे होणारे शासनाचे करोडो रुपयांचे नुकसान आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक फटका टाळण्यासाठी प्रकल्पाचे युद्धपातळीवर काँक्रिटीकरण किंवा पाइपलाईन टाकून सुधारित अंदाजपत्रक तयार करून निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली..Aarfal Water Canal : आरफळ कालवा प्रश्न पेटणार.कॅनॉलचा भराव मुरूम मिश्रित मातीने केल्यामुळे त्याला मोठी गळती लागली आहे, ज्यामुळे सिंचन प्रणाली पूर्णपणे कोलमडली आहे. सिंचन झाल्यास शेतकरी समृद्ध होतील आणि राज्याच्या विकासाला हातभार लागेल, .Almatti Dam : अलमट्टीतून औज, चिंचपूर बंधारे भरणे अशक्य.याकडे श्री. अहिरराव यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन सुधारित अंदाजपत्रक व निधी मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती रमेश अहिरराव यांनी केली..या वेळी धाडणे येथील सरपंच उषाबाई साहेबराव सोनवणे, संजय अहिरराव, संजय पाटील, संदीप सोनवणे, शरद देवरे, यशवंत बोरसे, आशिष अहिरराव, निंबा बोरसे, रामभाऊ अहिरराव, देविदास अहिरराव, दिलीप बोरसे, योगेश अहिरराव आदींसह शेतकरीउपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.