Jalna News: जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामातील सिंचनासाठी सोमवारी (ता.एक) पहिल्या आवर्तनाचे पाणी सोडण्यात आले. त्यात आता एक हजार क्युसेसने वाढ करण्यात आली आहे. .दरम्यान, शुक्रवारी रात्री हे पाणी परिसरात पोचले आहे.या पाण्यामुळे तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी दिलासा मिळणार आहे..Rabi Irrigation : निम्म मानारमधून रब्बीसाठी तीन पाणी पाळ्या.जायकवाडी धरण सध्या ९९.४५ टक्के भरलेले असून डाव्या कालव्यातून एक हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शेतकऱ्यांनी डाव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केल्यानंतर जलसंपदा विभागाने तत्काळ पाणी सोडले आहे..Rabi Irrigation : ‘गिरणा’चे पाणी शेतीला डावलून उद्योगासाठी राखीव.२० ते २५ दिवस हे आवर्तन सुरू राहणार आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, परतूर, परभणीमधील पाथरी, गंगाखेड आदी तालुक्यातील लाखो हेक्टर क्षेत्रातील गहू, हरभरा, कांदा यासह ऊस पिकाला फायदा होणार आहे. .कुंभार पिंपळगावसह परिसरातील अनेक चाऱ्यांची दुरुस्ती करून खोलीकरण करण्यात आले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना बागायतीसाठी मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांनी दहा-दहा किलोमीटर पाइपलाइन टाकून कोरडवाहू जमिनी बागायती केल्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.