Dharashiv News: खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे, विहिरींचे मोठे नुकसान झाले आहे. खरडून गेलेल्या जमिनी आणि खचलेल्या, बुजलेल्या विहिरींची पुनर्बांधणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे..संबंधित शेतकऱ्यांनी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. खरडून गेलेल्या शेतजमिनींच्या पुनर्वसनासाठी प्रति हेक्टर तीन लाख रुपये अनुदान आणि जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत पाच लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. खचलेल्या व बुजलेल्या.Farmer Relief Fund: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४४ हजार कोटींचे पॅकेज दिले: अजित पवार.सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी प्रति विहीर जास्तीत जास्त ३० हजार रुपये मदत शेतकऱ्यांना देण्यात येणारआहे..Farmer Relief: सोळा लाख शेतकऱ्यांना मिळाले अनुदान.या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना शेतजमिनी व सिंचन साधनांची पूर्वस्थिती पुन्हा उभी करण्यास मदत होणार असून, आगामी हंगामात शेती पुन्हा सक्षम होण्यास हातभार लागणार आहे..नुकसानीसंदर्भातील प्रस्ताव संबंधित गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे सादर करावेत. तपासणी व मंजुरीनंतर पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आ ले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.