Amaravati News : देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या यवतमाळ, अमरावती जिल्ह्यांतील कापूसपट्ट्यात आहेत. त्या पार्श्वभूमीवर कापूस उत्पादकांचे प्रश्न प्रत्यक्ष समजून घेत त्याआधारे निश्चित रूपरेषा तयार करून कापूस उत्पादकांचा संघर्ष देशपातळीवर नेण्याचा संयुक्त किसान मोर्चाचा मानस आहे. त्याकरिता म्हणून राकेश टिकैत यांच्यासह किसान संघाचे पदाधिकारी बुधवार (ता. १७) पासून दोन दिवशीय अमरावती दौऱ्यावर येत आहेत..विदर्भात गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत एक हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील बहुतांश आत्महत्या या कोरडवाहू कापसाखालील पावणेपाच लाख हेक्टर क्षेत्र असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. त्या पाठोपाठ अमरावती जिल्ह्यात आत्महत्यांचा आलेख वाढता आहे. भारतात शेतकरी आत्महत्या का करतात? आणि काय केले म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील? याकरिता भारतीय संसदेने डॉ. एम. एस. स्वामिनाथन आयोग नेमला होता. .Cotton Rate: कापसाचा भाव हमीभावापेक्षा कमीच राहण्याची शक्यता.आयोगाचा अंतरिम अहवाल व शिफारशी १९८६ मध्ये संसदेच्या पटलावर मांडल्या गेल्या. परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही. या माध्यमातून शेतकऱ्यांप्रती शासनाची संवेदनशीलताही प्रकर्षाने समोर आली. विशेष म्हणजे देशात सर्वाधीक आत्महत्या या कापूस उत्पादकांच्या आहेत. ही बाब भारतीय किसान संघाने गांभीर्याने घेत या मुद्याच्या मुळाशी जाण्याचा निर्धार केला आहे. .Cotton Picking : खानदेशात कापूस वेचणीला सुरूवात.त्याअंतर्गत भारतीय किसान संघाचे नेते राकेश टिकैत यांच्यासह युद्धवीर सिंग (भारतीय किसान युनियन), डॉ. अशोक ढवळे, विजू कृष्णन (अखिल भारतीय किसान सभा), राजन क्षीरसागर, के. डी. सिंग, ताजीदरसिंग विर्क (तराई किसान युनियन), गुरुमितसिंग मेहमा, रामींदरसिंग पटियाला, मामीदला बिक्षापती, सुखवींदरसिंग औलाख (क्रांतिकारी किसान युनियन), राजेंद्र बावके, उद्धव शिंदे (किसान महासंघ), अनिल त्यागी, गोपीनाथ कांबळे, ॲड. शिव सिंग, सुशीला मोराळे, मांडला व्यंकणा, दासू बालेसाहेब, मास्टर सतीश आजाद, शशिकांत, प्रत्युष श्रीवास्तव, विजय जावंधिया, एस. व्ही. जाधव, विलास भोंगाडे, माधुरी खडसे, शालिनी वानखेडे हे शेतकरी नेते बुधवार (ता. १७) व गुरुवार (ता. १८) असे दोन दिवसाच्या अमरावती दौऱ्यावर येत आहेत..अजित नवले, बच्चू कडू करणार प्रतिनिधीत्वया दौऱ्यात कापूस उत्पादक, शेती अभ्यासक यांच्याशी संवाद साधत त्यांचे मूळ प्रश्न जाणून घेतले जातील. त्याआधारे एक कार्यक्रम तयार करून कापूस उत्पादकांच्या प्रश्नावर देशव्यापी आंदोलनाची हाक देण्याचा प्रस्ताव असल्याचे संयुक्त किसान मोर्चाचे अमरावती जिल्हा निमंत्रक अशोक सोनारकर यांनी सांगितले. अजित नवले तसेच माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे विदर्भात संयुक्त किसान मोर्चाचे प्रतिनिधित्व करतील..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.