Government Scheme: राज्य सरकारने अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या नावाखाली राज्यातील शेतकऱ्यांची क्रूर माकडचेष्टा चालवली असून, ही शुद्ध फसवणूक आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे..शेट्टी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की सातबारा कोरा करण्याच्या मोठ्या गप्पा मारणारे नेते आता शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा करण्याच्या केलेल्या घोषणेचा फुगा फुटला आहे. प्रत्यक्षात थकीत कर्जदारांना केवळ २ लाख रुपये आणि नियमित कर्ज भरणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना अवघे ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले. हा राज्यातील कोट्यवधी कर्जदार शेतकऱ्यांचा मोठा विश्वासघात आहे..Farm Loan Waiver: कर्जमाफीची पहिली केवळ ५३३ जणांची यादी, शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ नको अन्यथा...; राजू शेट्टींचा सरकारला इशारा.गेल्या आठ महिन्यांत राज्य सरकारने जिल्हा बँका आणि विविध कार्यकारी विकास सोसायट्यांकडून तब्बल ११ वेळा शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती गोळा केली. एवढी छाननी करूनही आठ महिन्यांनंतर पहिल्या दिवशी केवळ ५३३ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. एवढ्या संथ गतीने काम करून सरकारला कर्जमाफी द्यायची आहे की टाळाटाळ करायची आहे, असा संतप्त सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला आहे..Farm Loan Waiver: रविकांत तुपकरांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, कर्जमाफीतील जाचक निकष, अटी काढून टाकण्याची मागणी .राज्य सरकारच्या तिजोरीत शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसेच शिल्लक राहिलेले नाहीत. केवळ योजनांच्या जाहिराती करून वेळ मारून नेण्याचे काम सुरू आहे. पैशांअभावीच सरकार अशा प्रकारे वारंवार याद्या लांबवून आणि माहिती मागवून चालढकल करत आहे, हे आता उघड झाले आहे. आज राज्यातील शेतकरी कमालीच्या आर्थिक संकटात सापडला आहे. एकीकडे लांबलेला पाऊस, दुसरीकडे खतांचे गगनाला भिडलेले दर आणि बाजारपेठेतील प्रचंड महागाई यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने सरसकट कर्जमाफी देऊन दिलासा देणे गरजेचे असताना सरकार मात्र वेळकाढूपणा करत आहे, असा आरोपही त्यांनी केला..संयमाचा अंत पाहू नये‘‘सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. जर ही प्रशासकीय चालढकल थांबवून तातडीने सर्व पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी जाहीर करून बँक खात्यात पैसे जमा केले नाहीत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण राज्यात सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन छेडेल,’’ असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.