मुख्यमंत्री शक्तिपीठ महामार्गाचा अट्टाहास कशासाठी करत आहेत? राजू शेट्टींचा सवालशक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांसह नागरीकांचाही मोठ्या प्रमाणात विरोधकोकणातील अनेक प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत.Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाला विरोध सुरुच आहे. रत्नागिरी ते नागपूर हा समातंर महामार्ग असताना आणि तो तोट्यात चाललेला असताना राज्याचे मुख्यमंत्री शक्तिपीठ महामार्गाचा अट्टाहास कशासाठी करत आहेत? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केला आहे. ते सावंतवाडी येथे झालेल्या शक्तिपीठ विरोधी कृती समितीच्या मेळाव्यात बोलत होते..राज्य सरकारने आणि लोकप्रतिनिधींनी कोकणच्या विकासाच्या नावाखाली कोकणला भकास केले आहे. कोकणातील अनेक प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. राजकीय मंडळीच्या फायद्याचे प्रकल्प राबविण्याचा विडा मुख्यमंत्री फडणवीस सरकारने उचलला असून शक्तिपीठ महामार्ग हा त्यातीलच एक भाग असल्याचे परखड मत त्यांनी व्यक्त केले आहे..Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’च्या भूसंपादनासाठी बार्शीत प्रशासनाची दडपशाही.राज्यामध्ये शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांसह नागरीकांचाही मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहे. या महामार्गामध्ये जवळपास ५० हजार कोटीचा ढपला पाडण्याचा सरकारचा डाव आहे. हा डाव आम्ही हाणून पाडू. शक्तिपीठ महामार्गाच्या जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार हे ५० हजार कोटींच्या ढपल्यातील लाभार्थी आहेत. यामुळे ते कुणीही विरोध करत नाहीत. .Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांचा सन्मान करत शक्तिपीठ महामार्ग रद्द करा.कोल्हापूर जिल्ह्यातून कोकणातील बांदा येथे संपणारा शक्तिपीठ महामार्गामुळे कोकणातील खनिज संपत्तीचे मोठ्या प्रमाणात लूट करण्यात येणार आहे. वन्यजीव तसेच लाखो झाडांची यामध्ये कत्तल करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेळे आंबोली ते घारपी उडेलीतून असनीये तांबोळी मार्गे डेगवे बांदा असा ३८ किमीचा शक्तिपीठ मार्ग प्रस्तावित आहे. सदर मार्गातील सगळा भाग हा जैवविविधेने संपन्न असा इको सेन्सिटिव्ह झोन असल्याचे शेट्टी म्हणाले..सध्या कोकणात येण्यासाठी कोल्हापूर येथून ७ महामार्ग आहेत. कोकणातील अनेक प्रकल्प निधीअभावी रखडले आहेत. १७ वर्षापासून मुंबई -गोवा महामार्ग रखडला आहे. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग १५ वर्षापासून निधीअभावी रखडला आहे. मग कोकणामध्ये येणारा नवीन शक्तिपीठ महामार्गाचा अट्टाहास कशासाठी? खरंच जर फडणवीस यांना कोकणचा विकास करायचा असल्यास वरील गोष्टींना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सूचित केले आहे..ऊसदरासाठी स्वाभिमानीचे आंदोलन सुरुचदरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदारासाठी स्वाभिमानीचे आंदोलन सुरुच आहे. आज बेळगाव -वेंगुर्ला रस्त्यावर पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले. मागील वर्षीची २७ कोटीची थकीत एफआरपी आणि चालू वर्षीच्या ३,७५१ रूपयांची पहिली ऊचल या मागणीसह तातडीने सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू करा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.