Solapur News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी येथील सभेत ‘काटा मारणारे साखर कारखाने मी शोधून काढले आहेत; त्यांना मी दाखवणार आहे,’ असा इशारा दिला, यावर टोला लगावताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘‘काटा मारणाऱ्या साखर कारखान्यांची यादी व पुरावे मी यापूर्वीच त्यांच्याकडे दिले होते. पण तेच कारखानदार आज भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे त्यांनी आता कारवाईचे धाडस दाखवावे,’’ अशा शब्दात मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे.मराठवाड्यातील परभणी, लातूर व धाराशिव जिल्ह्यांच्या दौऱ्यानंतर सोलापूर शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेत श्री. शेट्टी बोलत होते. .‘‘राज्यात जे साखर कारखाने वजनकाट्यात फेरफार करतात, रिकव्हरी कमी दाखवतात, त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी. सर्व कारखान्यांचे वजनकाटे व रिकव्हरी प्रक्रिया ऑनलाइन करण्याचे धाडस सरकारने दाखवावे. तेव्हाच शेतकरी हिताचे प्रत्यक्ष रक्षण होईल,’’ असेही ते म्हणाले..Raju Shetti : अतिवृष्टी, पुरानं पीक नष्ट झालं; हा ओला दुष्काळ नाही तर काय?, राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना सवाल.श्री. शेट्टी म्हणाले, की अतिवृष्टिग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे दृश्य विदारक आहे. अनेक ठिकाणी पिके वाहून गेली, शेतीत पाच ते सहा फूट माती वाहून गेली किंवा काही ठिकाणी पाच फुटांपर्यंत भराव आला. विहिरी, जनावरे आणि गोठे वाहून गेले आहेत. मात्र सरकार तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे, हवामान खात्याने रेड अलर्ट दिला असतानाही महसूल आणि जलसंपदा विभागात समन्वय नसल्याने सीना नदीला पूर आला. हा पूर पूर्णपणे मानवनिर्मित आहे. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई केली नाही तर आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावू, असा इशारा त्यांनी दिला..Raju Shetti: जलसंपदा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा: राजू शेट्टी .‘मुख्यमंत्री फडणवीसांकडून दिशाभूल’‘‘२०२२ मध्ये विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत राज्यभर दौरे केले. आज मात्र सत्तेत आल्यावर तेच ओला दुष्काळ निकषात बसत नसल्याचे सांगत आहेत. सत्तेत असताना एक भूमिका आणि विरोधात असताना दुसरी भूमिका घेऊन सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे, अशी टीका श्री. शेट्टी यांनी केली..‘...अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही’महसूल व जलसंपदा विभागातील समन्वयाच्या अभावामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुराचा जबर फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे शेती, जनावरे, विहिरी आणि शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. सरकारने दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी, अन्यथा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांना ‘दिवाळी करू देणार नाही, असा थेट इशाराही श्री. शेट्टी यांनी दिला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.